आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 26 November 2012

ठाणे जिल्ह्याविषयी माहिती

                  ठाणे जिल्ह्याविषयी माहिती
महाराष्ट्र  राज्या तील काही मोजक्‍या औद्योगिकद्ष्ट्या प्रगत जिल्ह्या पैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्‍तरेकडील जिल्‍हा आहे. पूर्वेकडे सहयाद्री पर्वतांच्‍या रांगा तर पश्चिमेकडे अरबी समुद्र , उत्तरेस गुजरात राज्‍य तर दक्षिणेला जग प्रसिध्‍द
मुंबई शहर अशा या जिल्‍हयाच्‍या चतु:र्सिमा आहेत. जिल्‍हृयाला 112 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जिल्‍हयाचे क्षेत्रफळ 9558 चौ. कि.
मी. असून ते राज्‍याच्‍या 3.11 टक्‍के आहे. राज्‍यात क्षेत्रफळाच्‍या द्ष्टीने जिल्‍हयाचा 16 वा क्रमांक आहे.
जिल्‍हयातील ठाणे, कल्‍याण, उल्‍हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, वसई व पालघर हे तालुके औद्योगिकद्ष्ट्या विकसित असून, मुंबई शहराच्‍या आधूनिक
संस्‍कृतीच्‍या प्रभावाखाली आहेत. तर शहापूर, मुरबाड, वाडा, जव्‍हार, विक्रमगड, मोखाडा, डहाणू व तलासरी या तालुक्‍यांचा प्रदेश डोंगराळ असून आदिवासी
वस्‍तीने व्‍यापलेला आहे. जिल्‍हयात जव्‍हार व सूर्यमाळ ही थंड हवेची तर अर्नाळा किल्‍ला, माळशेज व वज्रेश्‍वरी बोर्डी, केळवा ही निसर्गरम्‍य प्रेक्षणीय
स्‍थळे पर्यटनासाठी प्रसिध्‍द आहेत.
जिल्‍हयातील एकूण गावांची संख्‍या 1890 असून 6 महानगरपालिका व 9 नगरपालिका आहेत. ग्रामीण विकासाच्‍या दृष्‍टीने जिल्‍हयात एकूण 968
ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतीची एकूण सभासद संख्‍या 7769 इतकी असून 9 नगरपालिकांमधील सभासद संख्‍या 291 आहे. त्‍याचप्रमाणे 6
महानगरपालीकामधील सभासद संख्‍या 535 तर ठाणे जिल्‍हा परिषद सदस्‍य संख्‍या 66 इतकी आहे. जिल्‍हयात शासकीय कर्मचा-यांची संख्‍या 46,498
इतकी असून जिल्‍हा परिषद कर्मचा-यांची संख्‍या 18,283 इतकी आहे. जिल्‍हयातील 9 नगरपालिका आणि 6 महानगरपालिका यातील कर्मचारी संख्‍या
अनुक्रमे 3488 व 37471 इतकी आहे.
2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयाची लोकसंख्‍या 8131849 इतकी आहे. लोकसंख्‍येच्‍या बाबतीत ठाणे जिल्‍हा हा मुंबई जिल्‍हयाच्‍या खालोखाल
राज्‍यातील दुस-या क्रमांकाचा मोठा जिल्‍हा आहे. 72.58 टक्‍के नागरी लोकसंख्‍या असलेला ठाणे जिल्‍हा राज्‍यात मुंबई नंतर सर्वाधिक नागरीकरण झालेला
जिल्‍हा आहे. राज्‍यात 10 लाखाहून अधिक लोकसंख्‍या असलेली 7 महानगरे असून त्‍यातील 2 महानगरे ठाणे जिल्‍हयातील आहेत. 1991 ते 2001 या
दशकात जिल्‍हयाच्‍या लोकसंख्‍येत 54.92 टक्‍के वाढ झाली. ही वाढ राज्‍याच्‍या 22.57 टक्‍के वाढीपेक्षा 2.43 पटीने अधिक आहे. जिल्‍यातील ग्रामिण
भागातील दशवार्षिक वाढ 20.12 टक्‍के इतकी होती तर नागरी भागातील दशवार्षिक वाढ 73.95 इतकी होती. नागरी भागातील ही वाढ राज्‍यातील इतर
जिल्‍हयांच्‍या तुलनेत सर्वाधिक असल्‍याचे दिसून येते.
महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या एकूण क्षेत्रापैकी 3.11 टक्‍के क्षेत्र व्‍यापलेल्‍या ठाणे जिल्‍हयात 2001 च्‍या जनगणनेनुसार राज्‍यातील 8.40 टक्‍के व्‍यक्‍ती राहतात. ठाणे
जिल्‍हयातील लोकसंख्‍येची घनता दर चौ. कि. मी. 851 इतकी आहे. तर राज्‍याचे हेच प्रमाण केवळ 315 इतके आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे
जिल्‍हयात दर हजार पुरुषांमध्‍ये स्त्रियांचे प्रमाण 858 इतके आहे. राज्‍याचे हेच प्रमाण 922 इतके आहे.
2001 च्‍या जनगणनेनुसार जिल्‍हयातील अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्‍या अनुक्रमे 4.18 टक्‍के व 14.75 टक्‍के आहे. महाराष्‍ट्र राज्‍यात हे प्रमाण
अनुक्रमे 10.20 टक्‍के व 8.85 इतके आहे. जिल्‍हयातील अनुसूचित जातीचे प्रमाण अंबरनाथ तालुक्‍यात सर्वाधिक 8.26 टक्‍के इतके असून अनुसूचित
जमातीचे सर्वाधिक प्रमाण मोखाडा तालुक्‍यात 90.56 टक्‍के इतके आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाण जिल्‍हयातील 7 तालुक्‍यात 50 टक्‍के पेक्षा अधिक
आहे. 2001 च्‍या जनगणनेनुसार जिल्‍हयातील एकूण काम करणायांची संख्‍या 31,79,981 असून ते जिल्‍हयातील लोकसंख्‍येच्‍या 39.11 टक्‍के इतके आहे.
एकूण काम करणा-यापैकी शेतक-यांची संख्‍या 12.22 टक्‍के, शेतमजूर 9.64 टक्‍के, घरगुती उद्योगधंद्यात गुंतलेले कामगार 2.50 टक्‍के आणि इतर क्षेत्रात
काम करणा-याची संख्‍या 75.64 टक्‍के इतकी आहे. एकूण काम करणा-या व्‍यक्‍तीपैकी स्त्रियांचे प्रमाण 23.17 टक्‍के आहे. राज्‍यातील हेच प्रमाण 34.78
टक्‍के इतके आहे.
2001 च्‍या जनगणनेनुसार ठाणे जिल्‍हयातील साक्षरतेचे प्रमाणे 80.67 टक्‍के इतके असून राज्‍यात हेच प्रमाण 76.88 टक्‍के इतके आहे. जिल्‍हयातील
ग्रामिण भागातील 64.45 टक्‍के तर नागरी भागात 86.56 टक्‍के व्‍यक्‍ती साक्षर असल्‍याचे दिसून येते. पुरुष व स्त्रिया यांचे जिल्‍हयातील साक्षरतेचे प्रमाण
अनुक्रमे 80.00 व 73.10 टक्‍के इतके आहे.
जिल्‍हयात प्राथमिक शाळांची संख्‍या 4518 असून त्‍यातील शिक्षकांची संख्‍या 23170 इतकी आहे. जिल्‍हयात प्रती शिक्षक विद्यार्थी संख्‍या 42 इतकी असून
राज्‍याचे हेच प्रमाण 36 इतके आहे. जिल्‍हयात माध्‍यमिक आणि उच्‍च माध्‍यमिक शाळांची संख्‍या 956 इतकी असून वरिष्‍ठ महाविद्यालयांची संख्‍या 20
इतकी आहेत.
जिल्‍हयात ग्रामिण भागात आरोग्‍य सेवा पुरविण्‍याकरीता 79 प्राथमिक आरोग्‍य केंद्र असून त्‍या अंतर्गत 487 उपकेंद्र आहेत. त्‍याचप्रमाणे कुटीर, ग्रामिण
व इतर रुग्‍णालयांची संख्‍या 21 असून अतीदुर्गम भागात आरोग्‍य सेवा पुरविण्‍याकरीता 35 फिरती पथके कार्यरत आहेत.

No comments: