आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 23 July 2016

लोकमान्य टिळक

*आज २३ जुलै*

*लोकमान्य टिळक
जयंती*


टिळकांचे पुर्ण  नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.
सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. 




 १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त झाला. यावेळी प्लेग आटोक्यात आणण्यासाठी सरकार करीत असलेल्या कारवाईवर त्यान्नी कडाडुन टिका केली .




स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची सिंहगर्जना होती .

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत प्रमुख भुमिका असणाऱ्या राष्ट्रीय कॉंगेसचे ते अध्यक्ष होते . १९२० ला त्यांच्या मृत्यूनंतर गांधीपर्व सुरु झाले.

एका शब्दाचे अनेक अर्थ


📗एका शब्दाचे अनेक अर्थ 📙                                                                  
           ☆अंतर - (१)मन
                        (२)लांबी
          ☆अंक  -  (१) मांडी
                        (२) आकडा (संख्या )
          ☆अंग  -    (१) शरीर
                         (२) बाजू
          ☆कर   -   (१)हात
                         (२)  सरकारी सारा
          ☆ दंड   -  (१)शिक्षा
                         (२)बाहू
          ☆नाद    - (१)छंद
                         (२)  आवाज
          ☆नाव     -(१)होडी
                         (२)कशाचेही नाव
          ☆ गार    - (१)थंड
                         (२)  बर्फाची गोटी
          ☆ चूक   - (१)दोष
                         (२) लहान खिळा
          ☆ जात  - (१)प्रकार
                        (२)समाज
          ☆जोडा  - (१)जोडपे
                         (२)  बूट
           ☆धडा   - (१)पाठ
                         (२)  रिवाज                  
           ☆ धनी  - (१)मालक
                         (२) श्रीमंत मनुष्य                
           ☆पत्र  -  (१) पान
                        (२) चिठ्ठी                
           ☆पास -  (१)उत्तीर्ण
                        (२)परवाना                
           ☆ बाल - (१)  बालक
                        (२)केस
           ☆फळ   - (१)यश
                         (२)झाडाचे फळ
           ☆रस   -   (१)द्रवपदार्थ
                         (२) गोडी
            ☆रक्षा  - (१) राख
                         (२) रक्षण
            ☆ वचन- (१)भाषण
                         (२)प्रतिज्ञा
            ☆वजन -  (१)भार
                          (२)मान
             ☆वळण - (१) वाकडा रस्ता
                            (२) प्रवृत्ती
             ☆वार  -  (१)घाव
                          (२) दिवस
            ☆सुमन  - (१)फूल
                          (२) चांगले मन
             ☆हवा -   (१) वायू
                           (२)पाहिजे असा
              ☆कलम- (१) लेखणी
                           (२) रोपांचे कलम
              ☆घट  -   (१)मडके
                            (२)झीज
              ☆चक्र  -  (१)चाक
                            (२) एक शस्त्र
              ☆चिमणी- (१)एक पक्षी
                             (२)गिरणीचे धुराडे
                ☆ तट -  (१)किनारा
                             (२) किल्ल्याची भिंत
                ☆ताव -  (१)तापविणे
                             (२) कागद
                ☆नग -   (१)पर्वत
                             (२)वस्तू
                 ☆वात  - (१)वारा
                              (२) दिव्याची वात
                 ☆हार -   (१)पराभव
                              (२)फुलांचा हार

          संकलक- श्री. विवेक शेळके

Thursday 21 July 2016

कांचनसंध्या- कवी बा.भ.बोरकर

कांचनसंध्या
कवी बा.भ.बोरकर यांची ही एक अतिशय सुंदर कविता. आपलं वय जसं वाढत जातं, तसं तसं आपण matured होत जातो, असं म्हणतात. म्हणजे, डोक्यावरचे केस कमी व्हायला लागतात, हातापायांचे सांधे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला लागतात, आणि इतरांकडून आपल्या अपेक्षा वाढू लागतात!
मोरोपंत म्हणतात, तशी कृतांतकटकामलध्वजजरा दिसायला लागली, तरी सुखसमाधान आणि कृतार्थता या भावनां ऐवजी वैफल्य आणि कडवटपणा येण्याचा संभव जास्त !!

आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा मुलं-बाळं मार्गी लागलेली असतात, जगाचे भले बुरे अनुभव घेऊन झालेले असतात, त्यावेळी उदासी येण्याऐवजी आयुष्याकडे सकारात्मक कसे बघावे हे ही बाकीबाब यांची कविता शिकवून जाते…..

👇

पिलांस फुटुनी पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे,

आता आपुली कांचनसंध्या
मेघडंबरी सोनपुटें.

कशास नसत्या चिंता-खंती
वेचू पळती सौम्य उन्हे,

तिमिर दाटता बनुनि चांदणें
तीच उमलतील संथपणे.

सले कालचीं विसरून सगळी
भले जमेचें जिवीं स्मरूं,

शिशुहृदयाने पुन्हा एकदा
या जगतावर प्रेम करूं.

उभ्या जगाचे अश्रु पुसाया
जरी आपुले हात उणे

तरी समुद्रायणी प्रमाणें
पोसूं तटिची म्लान तृणें.


इथेच अपुली तीर्थ-त्रिस्थळी
वाहे अपुल्या मुळी-तळी,

असू तिथे सखि! ओला वट मी आणिक तूं तर देव-तळी.


शिणुनी येती गुरें-पाखरें
तीच लेकरें जाण सखे,

दिवस जरेचे आले जरी
त्या काठ जरीचा लावू सुखें...!


– बा.भ. बोरकर

*******

विज्ञानातील सूत्रे

सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)

त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)

बल = वस्तुमान * त्वरण

गतिज ऊर्जा = 1/2mv2

स्थितीज ऊर्जा = mgh

आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा

विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u

सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता

प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान

रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान

प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान

द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार

दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार

विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ

वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)

समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2

ध्वनीचा वेग = अंतर / वेळ

पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ

पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट

उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता

ओहमचा नियम = I = V / R

विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल

कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार


संकलन-
श्री. विवेक शेळके 

हसत खेळत गणितीय शिक्षण

🎯 महाराष्ट्र अ‍ॅडमिन पॅनल 🎯  
➖➖Ⓜ🅰🅿➖➖

संकलक --  शंकर  चौरे(पिंपळनेर )धुळे                        ➖🔴➖🔴➖🔴➖🔴


    📖 हसत खेळत गणितीय शिक्षण 📖
       
                 
                   
(१)    १  मिनिट = ६० सेकंद .
(२)    १  तास = ६० मिनिटे .
(३)    २४ तास  = १ दिवस .
(४)    पाव तास =१५ मिनिटे.
(५)    अर्धा तास =३० मिनिटे.
(६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
(७)     ७ दिवस = १ आठवडा.
(८)     ३० दिवस = १ महिना.
(९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
(१०)   १० वर्ष = १ दशक .
(११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२)   पाव वर्षे = ३ महिने .
(१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
(१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
(१५)    एकशे =१००
(१६)    अर्धाशे =५०
(१७)    पावशे =२५
(१८)    पाऊणशे =७५
(१९)    सव्वाशे =१२५
(२०)    दीडशे = १५०
(२१)    अडीचशे =२५०
(२२)    साडेतीनशे =३५०
(२३)    १डझन=  १२ वस्तू
(२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
(२५)    पाव डझन=३ वस्तू
(२६)    पाऊण डझन=९ वस्तू
(२७)    २४ कागद = १ दस्ता
(२८)    २० दस्ते=१ रीम
(२९)    ४८० कागद = १  रीम
(३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
(३१)    १ हेक्टर =१०० आर
३२ )    १एकर= ४००० चौ .मी
(३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर
(३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर
(३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
(३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
(४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम
(४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
(४४)    पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
(४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
(४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर
(४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
(४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर
(४९)   १हजार=१०००
(५०)   अर्धा  हजार =५००
(५१)   पाव हजार =२५०
(५२)   पाऊण हजार  =७५०
(५३)   १२ इंच =१ फूट
(५४)   ३ फूट =१ यार्ड
(५५)   १ मैल =५२८० फूट
(५६)   १ क्विंटल =१०० किलोग्रॅम
(५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम
(५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम
(५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६०)   १ टन= १० क्विंटल
(६१)   १  टन= १००० कि.ग्रॅ.

                        संकलक- शंकर चौरे. (प्रा.शि )
                  जि. प.शाळा- बांडीकुहेर ता. साक्री जि. धुळे
                   ९४२२७३६७७५
                       ७७२१९४१४९६
====➕=Ⓜ🅰🅿=✖=====
     

RTE - RIGHT TO EDUCATION.

Right To Education Act 2009
RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यव.स्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.

संकलन- श्री. विवेक शेळके 

शब्दांचा डोंगर .....

*🇷रचनावादी🇹टिचर🇨क्लब*  🖊
            🔸🇷 🇹 🇨🔸
         *MAHARASHTRA*


  📝शब्दांचा डोंगर 📖

         या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम एक शब्द दिला जातो. नंतर त्या शब्दास अनुसरन खालील प्रत्येक ओळीत एकेक शब्द / शब्दसमुह क्रमाने वाढवण्यास सांगणे. यावेळी विद्यार्थ्यांकडून खुप मोठ्या शब्दडोंगराची अपेक्षा करु नका. सुरुवातीला 3 ते 4 ओळींचा झाला तरी चालेल. मात्र हळूहळू तो वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.

  उदाहरणार्थ
✅आंबा
✅आंबा खातो.
 ✅रमेश आंबा खातो.
✅ रमेश गोड आंबा खातो.
रमेश  हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.

 ✅रमेश दररोज हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.

✅रमेश दररोज सकाळी हिरव्या रंगाचा गोड आंबा खातो.

🌀या उपक्रमातून पुढील बाबी साध्य होतात :

१) व्याकरणाचा भाग सहजतेने घेता येतो.

२) मनोरंजनातून मुले वाक्य तयार करतात.

३)आपण सांगितलेले वाक्य मुले लक्षात ठेवतात.

४)मुलांच्या शब्दसंपत्तीत वाढ हाेते.

५)बाेली भाषेतील अनेक नवीन शब्द परीचित हाेतात.

६) अबाेल व शांत असणारी मुले बाेलतात व आपले विचार मांडतात.

७)अपुर्ण गाेष्ट पुर्ण करणे ..अपुर्ण कविता पुर्ण करणे या काैशल्यांचा नकळत पणे विकास हाेताे.

८) दिलेल्या शब्दांशी सहसंबंध असणारे शब्द शोधण्याची प्रेरणा मुलांना मिळते.

९) मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास होतो.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
🙏शब्दांकन✍
📲9623124594
*श्री. मा.स.गुंडेवार*
जि.प.प्रा.म. शा. सातनदुधनी
ता.अक्कलकोट.जि.सोलापुर
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀        
✳👀®T©👀✳