आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Thursday 4 August 2016

धरणाची पाणी क्षमता

*धरण पाणी आवक जावक माप बघा किती पाणी येते जाते माहिती आहे का ?*

*1) TMC म्हणजे काय ?*
*2) Cusec म्हणजे काय ?*
*3) Cumec  म्हणजे काय ?*

*उत्तर*👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणं भरत आहेत, काही धरणातून पाणी सोडल्या जात आहे.

इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो.
याचा नेमका अर्थ काय?

आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.

१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.

01 tmc = 28,316,846,592 litres

२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.

३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.

उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.

याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.

महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ०५ धरणे 👇

१)उजनी ११७.२७ tmc
२)कोयना १०५.२७ tmc
३)जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४)पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५)पूर्णा येलदरी २८.५६ tmc

व्यावहारिक जगात लागणारे काही महत्वाची जमिनीची क्षेत्रफळाची रुपांतरे ;

१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] =
१०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] =
४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट

पायाभूत चाचणी श्रेणी

*पायाभूत चाचणीत गुणासाठी द्यावयाची श्रेणी..!!*

पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...        
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
       *🛡इ.२री साठी 🛡*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
🚥  २४ ते ३०   -    अ              
🚥  १८ ते २३    -   ब
🚥  १२ ते १७    -   क
🚥   ० ते११      -   ड
            श्रेणी द्यावी
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
       *🛡इ.३री ४थी 🛡*
 ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
🚥३२ ते ४०     -  अ
🚥२४ ते ३१     -   ब
🚥१६ ते २३     -   क
🚥० ते १५       -    ड
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
    *🛡५ वी ६ वी साठी 🛡*
  ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
🚥    ४०ते ५०    -    अ
🚥   ३० ते ३९   -     ब
🚥  २० ते २९    -   क
🚥   ० ते १९     -    ड
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
    *🛡७ वी ८ वी साठी* 🛡
   ┄─┅━━▣▣▣━━┅─┄
🚥  ४८ ते ६०     -  अ
🚥  ३६ ते ४७   -    ब
🚥  २४ ते ३५     -  क
🚥   २३ ते ०     -   ड
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
       श्रेणीनिहाय निकाल तयार करावा...
     ┄─┅━━▣▣▣━━┅

*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*


वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%

आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.

81 ते 100   अ
61 ते 80     ब
41 ते 60     क
0   ते 40      ड

(पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं  10 )

श्रावणाचे महत्व

*शुद्ध, सात्विक, पवित्र श्रावण*

का करतात श्रावणात उपवास?

*उपवासाचा शास्त्रीय अर्थ *

याच काळात जास्तीत जास्त उपास असल्याचे कारण देवाच्या सा‍निध्यात वास करावयाला मिळावा हे आहेच. पण कमीतकमी आहाराने आपला जठराग्नी जो या काळात मंद झालेला असतो त्यालाही जास्त काम करावयास लागू नये हाही त्यामागील शास्त्रीय अर्थ आहे. *पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात* हवामानामुळे शरीरच्या हालचाली कमी होण्याने तसेच जठराग्नी प्रदिप्त नसल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण, पावसाचे गढूळ पाणी यामुळे या काळात पोटाचे विकार वाढतात. त्यावर लंघ‍न किंवा अल्प *सात्विक आहार हे अत्यंत प्रभावी औषध* आयुर्वेदात सांगितले आहे. त्यामुळे या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने का होईना, तोंडाचे खाण्याचे काम कमी होऊन ते हरीनामाकडे त्याचा जप करण्याचे काम करू लागते हे काय कमी आहे?

*श्रावण*

हिंदू पंचागाप्रमाणे *देवशयनी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास* असतो. म्हणजे आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चार महिन्यांच्या काळात *देव निद्रिस्त* असतात, असे मानले जाते. त्यामुळे ह्या काळात पृथ्वीवरील सर्व बर्‍यावाईट घटनांचा परिणाम मानवावर होत असताना नेहमीप्रमाणे देवाच्या कृपेचे छत्र अखंड रहावे म्हणून या काळात जास्तीत जास्त पूजा-पाठ, जप जाप्य, प्रवचने, कीर्तने, भागवत सप्ताह, पारायणे केली जातात. या योगे देवाच्या कृपेचे छत्र कायम ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. त्यामुळेच या चार महिन्यात तो जास्तीत जास्त सदाचरणी रहाण्याचा प्रयत्न करतो.

या चार महिन्यांपैकी दुसरा येणारा श्रावण हा तर अत्यंत पवित्र महिना मानण्यात येतो.
 *गटारी आमावस्येला मनाचा मलिनपणा गटारात (घाणीत) सोडून द्यायचा असतो* आणि दिव्याच्या अवसेला जसे दिवे घासून पुसून स्वच्छ करतात तसेच मनही लख्ख करावे. अशा स्वच्छ आणि स्वात्विक मनाचेच प्रतिबिंब श्रावण महिन्यात पडते. श्रावणी सोमवार, प्रदोष हे सर्व पर्वकाल ह्याच काळात येतात. सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ असणारा भगवान शिव त्याला प्रसन्न करण्यासाठीच जणू हा महिना आहे असे वाटते म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराला शिवामूठ वाहण्याचा प्रघात आहे.

*सोमवारी काय वहाल?*

पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ, दुसर्‍याला तितीळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची मुठ, चौथ्याला जवस आणि जर पाचवा सोमवार आला तर सातूची मूठ शंकराला अर्पण केली जाते. यात अध्यात्मिक पूजेचे समाधान आहेच, पण पूर्वी आपल्याच शेतात पिकवलेल्या धान्याचा काही भाग देवाची कृतज्ञता म्हणून देवाला अर्पण करण्याची वृत्ती आहे, त्या अर्पिलेल्या धान्यातून ते त्या देवालयाच्या पुजारी, गुरव इत्यादींच्या चरितार्थाचेही साधन होते म्हणून यात मानवताही आहे.

*श्रावणातील मंगळागौर*

जिभेचे चोचले पुरविण्याचे कमी झाल्यामुळे सा‍हजिकच त्या दिवशी घरच्या गृहिणीलाही थोडा विसावा मिळतो व तिही आपल्या मैत्रिणींसमवेत नटूनथटून देवाच्या पूजेला, मंगळागौरीची पत्री गोळा करायला जाऊ शकते. फुलाची आरास करून प्रसन्न अशा रांगोळ्यांनी वातावरण निर्मिती तर होतेच पण त्यातून तिलाही सृजनाच्या निर्मितीचा आनंद मिळतो व तीही प्रसन्न होते.
मंगळागौरीच्या निमित्ताने सगळ्या माहेरवाशिणी जमतात. यथासांग महादेवाची पूजा करतात व जसा उमेने भोळ्या सांबाला आपल्याशी लग्न करायला प्रवृत्त केले व त्याबरोबर सुखाने कैलासावर राज्य केले तशाच ह्या नवविवाहिता आपल्या पतीसमवेत सुखी संसाराच्या स्वप्नात मग्न होतात.
मोठेपणाचे जोखड काही वेळ बाजूला ठेवून मंगळागौर जागवायला सगळ्याजणी तयार असतात. त्या खेळतात, गाणी म्हणतात फेर धरतात व मनातल्या भावना गीतांतून व्यक्त करून मोकळ्या मनाने पुढच्या दिवसांना, संकटांना सामोर्‍या जायला सज्ज होतात. अगदी सगळ्या सासुरवाशिणी (वय वाढली तरी) ह्या श्रावणातील सणांची वाट बघत असतात ते गौर जागवणं ते नागपंचमीचे वडाच्या पांख्यांवर घेतलेले उंच उंच झोके, रात्री हातला काढलेली मेंदी अन् त्या प्रत्येकाबरोबर लहानपणीच्या, तरुणपणीच्या सुखद आठवणी.

*श्रावणातील सण*

नारळी पौर्णिमेचा नारळी भात, नागपंचमीची दिंड, शुक्रवारच्या पुरणाच्या आरतीतले पुरण, पोळ्याची पुरणपोळी कडबोळी गोकुळाष्टमीचा गोपाळकाला हे विशिष्ट पदार्थ त्याची चव कायम आपल्याला आठवतेच. राखीपौर्णिमेला प्रत्येक जण आपल्या भावा बहिणीची आतुरतेने वाट बघतो. प्रत्यक्ष नाही तरी पोस्टाने तरी राखी यावी असे पूर्वी कायम वाटायचे. बहिणींना उद्या आपला दादुटल्या आपल्याला काय देणार याची उत्सुकता तर भावांना आपली राखी कशी असेल याची. आदल्या दिवशीच उधाणलेल्या दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करून आपला कोळीबांधव त्याला शांत व्हायला सांगतो. अन् दुसर्‍याच दिवशी असणार्‍या राखी पौर्णिमेच्या विचारानी बहीण नसणारा छोटा भाऊ, कोण मला ओवाळिल ह्या काळजीत चुर होतो.
सर्वांचा आवडता कृष्ण याचा जन्म (कृष्णाष्टमी) याच काळातला. त्याच्या जन्माष्टमीनिमित्त चालणारा उत्सव, त्याच्या रुपात नटेलेली बाळं, अन् जागोजागी बांधल्या जाणार्‍या दहीहंड्या त्या हंड्यांची कपची मिळवण्याची धडपड, काल्याचा प्रसाद हे एक ना अनेक विचार, आठवणी मनात अशा दाटून येतात.

या महिन्याच्या शेवटी येणारा पोळा हा सण तर सर्वात मोठा आहे. आपल्याला पिक देणार्‍या वसुंधरेची कृतज्ञता व्यक्त करतो ते श्रावणातील फूलपत्री उपास अन् सणांनी. पण प्राणीमात्रांची कृतज्ञता म्हणून नागपंचमीखेरीज आपण आपल्या नित्यजीवनातील सहकारी असलेल्या सर्जा-राजाच्या उपकाराची जाण पोळा या सणाच्या दिवशी व्यक्त करतो. त्या दिवशी त्याला सजवतो, गरम पाण्याने न्हाऊ घालतो. झुल गोंडे आरसे लावतो. शिंगात कडबोळी अन् त्याला कडबूचा घास भरवतो. (कर्नाटकात बेंदूर साजरा करतात तेव्हा पुरणपोळीपेक्षा पुरणाच्या कडबूचाच मान असतो त्या दिवशी.) त्याला ओवाळतो त्याची पूजा करतो.

सृष्टीला पडलेली श्रावणभूल
श्रावणातील धात्रीवरही वेगवेगळी असंख्य प्रकारची फुलं, कोवळे अंकूर याच काळात तयार होतात. शिरीष, पारिजातक, सोनचाफा, बकुळी ही फुले तर या ऋतु भरपूर येतातच. पण ठिकठिकाणी सायली अन् गौरीची फुलेही दिसतात. सोनटक्याची पिवळट पांढरी झाक असणारी फुलेपण श्रावणातच दिसतात. ऋतुचक्र या पुस्तकात दुर्गाताईंनी याचे फार सुंदर वर्णन केले आहे. त्या म्हणतात. श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग तर झाकून जातेच पण उघडे बोडके दगडही शेवाळाची मखमल पांघरुन बसतात. असा हा कुसुमाग्रजांनी वर्णिलेला *'हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण'.* त्याच्या आगमनाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे अगदी तुम्हाला अन् धरतीलाही.

Monday 1 August 2016

अण्णाभाऊ साठे

*विद्रोही कलावंत अण्णाभाऊ साठे*

 १ ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस. अण्णाभाऊंचा जन्म ही मराठी साहित्यातील एक क्रांतिकारक घटना. अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना बालपणापासूनच दारिद्रयाचे आणि सामाजिक विषमतेचे चटके सहन करावे लागले. एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. जीवनाच्या शाळेतच अण्णाभाऊ घडत गेले. अर्थातच औपचारिक शिक्षण न मिळाल्यामुळे अनौपचारिक शिक्षणातून त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक समृद्ध होत गेले. त्यांचा वाटेगाव ते मुंबई हा प्रवासच मुळात कामाच्या, भाकरीच्या शोधात झाला आहे. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर त्यांना पोटासाठी अनेक प्रकारची कामं करावी लागली. बालपणातील अशा दाहक, वेदनामय अनुभवामुळे त्यांचे मन बंडखोर, विद्रोही  बनत गेले.

मुंबईमध्ये पोटासाठी अनेक प्रकारची कामं करताना, कामगार म्हणून वावरताना त्यांना मार्क्स, लेनिन, गॉर्कीच्या विचाराने प्रभावित केले. समाजातील आर्थिक विषमता, दारिद्रय नष्ट करण्याचा आणि सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा समान हक्क देणारा मार्ग म्हणून त्यांना मार्क्सवाद प्रेरक वाटला. रशियन मार्क्सवादी कादंबरीकार गॉर्की हा अण्णाभाऊ साठेंचा आवडता लेखक आहे. गॉर्कीच्या साहित्याचा आणि विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्या साहित्यावर दिसून येतो. त्यामुळेच ते साहित्याकडे समाजपरिवर्तनाचे, क्रांतीचे एक महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून पाहतात. उपेक्षित समाजाला सर्व प्रकारच्या गुलामीतून मुक्त करण्याचे काम त्यांना साहित्याकडून अपेक्षित आहे. मार्क्सवादाबरोबरच नंतरच्या काळात डॉ. आंबेडकरांचा विचारही त्यांना समाजपरिवर्तनासाठी प्रेरक वाटला. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ. आंबेडकरांचा विचार त्यांना महत्त्वाचा वाटतो. म्हणून मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद या त्यांच्या लेखनामागील दोन मुख्य प्रेरणा आहेत.

अण्णाभाऊंची मराठी मातीशी आणि लोकजीवनाशी असणारी नाळ अतिशय घट्ट आहे. बालपणातच लोककलेचा त्यांनी जवळून अनुभव घेतला होता. अर्थातच, उपेक्षितांच्या जीवनातील लोककलेला म्हणजेच तमाशा, पोवाडा, लावणीला मार्क्सवादी दृष्टीचा साज चढवून अण्णाभाऊंनी समाज परिवर्तनाच्या संघर्षाला सुरुवात केली. कामगारांना जागृत, संघटित करण्यासाठी ते पोवाडे, लावण्या, क्रांतिगीते रचू लागले. मंचावरून सादर करू लागले. साधारणपणे १९४२ ते १९५० या काळामध्ये अण्णाभाऊ ‘लोकशाहीर’ म्हणून नावारूपाला आले.
अण्णाभाऊ लोककलावंत होते. त्यांच्याकडे मानवी जीवन समजून घेण्यासाठी लागणारी संवेदना होती. या संवेदनेमुळे आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञानामुळे त्यांना मानवी जीवनाकडे आणि साहित्याकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळेच त्यांना माणूस आणि त्या माणसाचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात.
‘लाल बावटा कलापथका’च्या माध्यमातून अण्णाभाऊंनी महाराष्ट्रभर जनजागृतीचे काम केले. शेकडो कार्यक्रमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. ते स्वतःच कामगार असल्यामुळे त्यांना कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची जाणीव होती. कामगारांचे भांडवलदार वर्गाकडून होणारे शोषण त्यांना चांगलेच माहीत होते. या भांडवलशाहीच्या जोखडातून कामगारांना मुक्त करण्यासाठी त्यांनी कामगार लढîkत स्वतःला झोकून दिले. कामगार चळवळ मजबूत करण्यामध्ये अण्णाभाऊंचे जसे महत्त्वाचे योगदान आहे, तसे अण्णाभाऊंच्या जडणघडणीत कामगार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जीवनसंघर्षाचा पूर्वार्ध म्हणून कामगारांच्या लढयातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
१९४२ ते १९६२ हा वीस वर्षाचा काळ अण्णाभाऊ साठे यांना माणूस आणि कलावंत म्हणून अधिकाधिक उंचीवर नेणारा ठरला. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करणारे अण्णाभाऊ आपल्या आवडत्या तत्त्वज्ञानावर उभा असलेला देश पाहण्यासाठी १९६१ मध्ये मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने करतात.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अण्णाभाऊंसारख्या लढाऊ कार्यकर्त्यामुळे अधिक व्यापक आणि सामर्थ्यशाली बनली. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. कामगार, कवी, लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, लोकनाटयाचे जनक, उत्तम नट, पत्रकार, निर्माता, आणि माणसावर, मानवी जीवनावर उत्कट प्रेम करणारा माणूस असे विविध पैलू अण्णाभाऊंच्या  व्यक्तिमत्त्वात आहेत. या अर्थाने अण्णाभाऊ साठे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ठरते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा शेवट मात्र मनाला चटका लावणारा आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबरी, शाहिरी कविता, लोकनाटय, नाटक आणि स्फुट लेखनातून विद्रोही जाणिवांचा उत्कट आविष्कार झाला आहे. वर्ग-जाती संघर्षाचे संमिश्र चित्रण त्यांच्या साहित्यात येते. म्हणून वर्गसमाज आणि जातिसमाज हे त्यांच्या विद्रोहाचे लक्ष्य आहे. अन्यायाविरुद्धची झुंज, संघर्ष, विद्रोह हा त्यांच्या लेखनविश्वाचा स्थायी भाव आहे. शोषक आणि शोषित यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय आहे. त्यांच्या सर्व प्रकारच्या लेखनातून शोषणाचा धिक्कार, प्रतिकार आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभावाचा पुरस्कार प्रत्ययास येतो. सामाजिक आणि आर्थिक विषमतेने शोषित माणसाचे ‘माणूस’ म्हणून असणारे अस्तित्वच नाकारले. अशा शोषितांना माणूसपण प्राप्त करून देण्यासाठीच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विद्रोही जीवनमूल्यांची पेरणी करते. उपेक्षित-शोषितांच्या अंतरंगातील विद्रोह आधुनिक मराठीतील ललित साहित्यात प्रथमच अण्णाभाऊंच्या साहित्यातून अनुभवाचा व्यापक पट घेऊन अभिव्यक्त झाला.

अण्णाभाऊपूर्व मराठी साहित्याचा केंद्रबिंदू मध्यमवर्ग होता. अण्णाभाऊंनी मात्र मस्तकात विद्रोह घेऊन जगणाऱ्या उपेक्षित, शोषित वर्गाला मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बनविले. हा त्यांचा विद्रोही प्रवास आधुनिक मराठी ललित साहित्यात अपूर्वच म्हणायला हवा. एकूणच, अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोहाचे जीवनगाणे आहे. या त्यांच्या साहित्याच्या मस्तकात विद्रोहाचा अग्नी आहे, तर हृदयात समतेचे, न्यायाचे मंगलमय मधुर, सुगंधी संगीत आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे सबंध साहित्यच विद्रोही तत्त्वज्ञानावर उभे आहे. हे विद्रोही तत्त्वज्ञान त्यांना मार्क्स, गॉर्की, फुले, आंबेडकर यांच्याकडून मिळालेले आहे. या विद्रोही तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मराठी साहित्याच्या भूमीत समाजपरिवर्तनाचा विचार पेरला. क्रांतीचा मळा फुलवला, सजवला. म्हणून आधुनिक मराठीतील महात्मा फुल्यांपासून चालत आलेल्या विद्रोही ललित साहित्याच्या प्रवाहाला अधिक सशक्त आणि व्यापक बनविणारे साहित्यिक म्हणून अण्णाभाऊ साठे महत्त्वाचे  ठरतात.

शोषणाला नकार देणारी आणि समतेचा पुरस्कार करणारी विद्रोही सांस्कृतिक परंपरा बळीराजा, चार्वाक, महावीर, बुद्ध, कबीर, तुकाराम, फुले-शाहू-आंबेडकर यांनी समृद्ध केली आहे. सर्व प्रकारच्या शोषणावर ‘घाव’ घालणारे अण्णाभाऊ साठे याच विद्रोही सांस्कृतिक विचारधारेचे वारसदार ठरतात.                                                🙏🏻                          
!!  विनम्र अभिवादन  !!