आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 26 October 2012

BABA AMATE


·          

इतर भाषा

मदत
    मुरलीधर देवीदास आमट


 

मुरलीधर देवीदास आमटे
जन्म
डिसेंबर २६, .. १९१४
हिंगणघाट, वर्धा जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू
फेब्रुवारी , .. २००८
निवासस्थान
आनंदवन, गडचिरोली जिल्हा
राष्ट्रीयत्व
भारतीय
टोपणनावे
बाबा आमटे
नागरिकत्व
भारतीय
शिक्षण
बी..एल.एल.बी.
ख्याती
कुष्ठरुग्णांची सेवा
धर्म
हिंदू
जोडीदार
साधना आमटे
अपत्ये
प्रकाश आमटे, विकास आमटे
वडील
देवीदास
पुरस्कार
रॅमन मॅगसेसे पुरस्कार,
पद्मश्री,
पद्मविभूषण,
महाराष्ट्रभूषण
स्वाक्षरी
संकेतस्थळ
आनंदवन

 

मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (डिसेंबर २६, .. १९१४ - फेब्रुवारी , .. २००८) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अश्या इतर सामाजिक चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

जीव

मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमट्यांचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील ब्राह्मण जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, .. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. तत्कालीन प्रख्यात हॉलिवुड तारका ग्रेटा गार्बो नोर्मा शियरर यांच्यासोबत त्यांचा पत्रव्यवहार होता. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेऊन .. १९३४ साली बी.. .. १९३६ साली एल. एल. बी. ही पदवी संपादन केली.आपण स्वतः डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. .. १९४९-५० या कालावधीत त्यांनी कुष्ठरोगनिदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. .. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्र्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी .. १९८५ मध्येभारत जोडोअभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

अभय साध

१९४२ च्या सुमारास एकदा बाबा ट्रेन ने वारोर्याला चालले होते. त्यावेळी ट्रेन मध्ये काही इंग्रज तरुण शिपाई एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा घाबरून ट्रेन मधील स्वचातागृहात लपून बसला होतं. त्यावेळी बाबा पुढे झाले आणि त्यानी इंग्रज शिपायांना थांबवण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना बाबांनी पहिल्यांदा काही ठोसे लगावले पण नंतर इंग्रज ही बाबांना मारू लागले. ट्रेन जेंव्हा वर्धा स्टेशनात थांबली तेंव्हा बाबांनी ती तेथेच अडवून ठेवली. खूप लोक जमा झाले. त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तेथे आला आणि त्याने चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट जेंव्हा गांधीजीना समजली तेंव्हा त्यानी बाबांना 'अभय साधक' असे नाव दिले. न्यायासाठी लढणारा निर्भय योद्ध.

आनंदवन



बाबा आमट

तत्कालीन समाजात कुष्ठरोग हे मागील जन्मीच्या पापांचे फळ समजले जाई. यामुळे कुष्ठरोग्यांस वाळीत टाकले जाई. आमट्यांनी एकदा पावसात कुडकुडत भिजणारा एक कुष्ठरोगी पाहिला[]. ते त्याला घरी घेऊन आले. तेव्हापासून त्यांनी कुष्ठरोग अभ्यासायला सुरुवात केली. .. १९५२ साली वरोडयाजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली[]. .. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे. असाध्य गोष्टींना स्वतःहून सामोरे जाण्याच्या आव्हानात्मक वृत्तीमुळे कुष्ठरोगासारख्या महाभयंकर रोगाने ग्रस्त झालेल्यांची सेवा करण्याचे अतिकठीण व्रत त्यांनी स्वीकारले. त्या अंतःप्रेरणेतून .. १९५१ साली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात त्यांनीआनंदवनाची स्थापना केली. मरणापेक्षा भयाण आणि कबरीपेक्षा भयंकर असे काही असेल तर ते कुष्ठरोग्याचे आयुष्य. प्रत्येक कुष्ठरोग्याला आपल्या कुशीत सामावून घेऊन त्याची केवळ सेवा-सुश्रूषाच करायची नव्हे, तर त्याला आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या बाबांनी केली. महारोगी सेवा समिती या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी त्या कार्याचा विस्तार केला. कोणत्याही व्यक्तीकडे समानतेने पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे आश्रमात आज सर्व धर्मांचे, सर्व थरांतील लोक आहेत. केवळ कुष्ठरोग्यांसाठीच नव्हे तर अंधांसाठी, मूकबधिरांसाठी विशेष शाळादेखील तेथे आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण पुनर्वसन याकरिता त्यांनी रुग्णालयाची अन्य प्रकल्पांची स्थापना केली. त्यांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालयाचीही स्थापना केली. प्रौढ अपंगांसाठी हातमाग, सुतारकाम, लोहारकाम असे व्यवसाय प्रशिक्षण सुरू करून त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. शेती त्या अनुषंगाने येणारे दुग्धशाला, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आदि कुटिरोद्योगही सुरू करून दिले. अशोकवन (नागपूर); सोमनाथ (मूल) या ठिकाणीही उपचार पुनर्वसन केंद्रे स्थापन केली. (आजही ही केंद्रे काम करत आहेत.) ‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’, या बा. . बोरकरांच्या ओळीचादेखणा प्रत्ययया प्रकल्पांच्या ठिकाणी येतो. घनदाट जंगल, दळणवळण-संपर्काची साधने नाहीत, प्रचंड पाऊस, पावसात मार्गच अडवून टाकणारे नद्या-नाले, जंगली श्वापदांचा सुळसुळाट, अन्न-वस्त्र-निवाऱ्याची कमतरता, काही वेळा शासनाचा असहकार, आदिवासींचे अज्ञान, अंधश्रद्धा अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही प्रचंड जिद्दीने बाबांनी आपली कामे पूर्णत्वास नेली.

भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे बाबांनी लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षांपासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे स्नुषा डॉ. मंदा आमटे समर्थपणे सांभाळत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासींना माहीत नसलेल्या शेतीच्या नवीन पद्धती शिकविल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांसाठी शाळा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तरायण ही निवासी संस्था, वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी अनाथालय असे विविध उपक्रमही हेमलकसा येथे यशस्वीपणे चालू आहेत. डॉ. प्रकाश डॉ. सौ. मंदा आदिवासींना अथकपणे आरोग्य सुविधा पुरवीत आहेतच. हे कार्य बाबांच्या प्रेरणेतूनच सुरू आहे.

कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, आजारी गाय सरकारकडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन यावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात बाबांच्या पत्नी श्रीमती साधनाताई आमटे यांचाही त्याच तोडीचा वाटा आहे. साधनाताईंनी लिहिलेल्यासमिधाया आत्मचरित्रपर पुस्तकातून साधनाताईंच्या संयमी, त्यागी बाबांच्या कार्यासह त्यांना सांभाळणाऱ्या समर्थ व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला होतो. ’समिधातून बाबांच्या जीवनकार्याचा आढावाही आपल्यासमोर येतो.

बाबा प्रत्यक्ष समाजकार्यात नसते, तर एक उच्च दर्जाचे प्रतिभावान साहित्यिक म्हणून समाजासमोर आले असते. सतत कामात असूनही त्यांनीज्वाला आणि फुलेआणिउज्ज्वल उद्यासाठीहे काव्यसंग्रह लिहिले. यांतून त्यांच्या साहित्यिक गुणांसह समाजकार्यावरची निष्ठाही दिसून येते.

एकदा रविंद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आश्रमास बाबा आमट्यांनी भेट दिली. शांतिनिकेतनाच्या या भेटीचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर गांधींजींच्या सत्य, नीति निर्भयतेवर आधारलेल्या विचारसरणीने प्रभावित होऊन दीनदलितांच्या सेवेसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले. गांधींजींनी त्यांना अभयसाधक अशी पदवी दिली होती.[संदर्भ द्या] गांधीप्रभावापूर्वी ते क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांचेही सहकारी होते.[संदर्भ द्या]

संवेदनशीलता, प्रखर बुद्धिमता, धाडस, प्रचंड कष्ट करण्याची शारीरिक मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवले ते साध्य करण्याची निश्चयी वृत्ती, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रेरणासातत्य या सर्व गुणांच्या आधारे बाबांनी आपले सर्व प्रकल्प यशस्वी केले. बाबा आमटे यांच्या नेतृत्वाखाली आमटे परिवार कार्यरत होताच, पण त्यांच्या कार्यामुळे अनेक क्षेत्रांतील सामाजिक कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली. बाबा आनंदवनात मित्रमेळ्याचे आयोजन करत असत. या मेळ्यांना अनेक कलाकारांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित रहात असत. यातूनच असंख्य कार्यकर्ते घडले, कामांना दिशा मिळाली.

फेब्रुवारी , .. २००८ रोजी वरोडा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. आज बाबांच्या पुढच्या पिढ्याही (डॉ.प्रकाश आमटे, विकास आमटे त्यांचे कुटुंबीय) विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने सातत्याने काम करीत आहेत.

कार्

.. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमट्यांनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापल्या :

  • आनंदवन - वरोरा (चंद्रपूर)
  • सोमनाथ प्रकल्प - मूल (चंद्रपूर)
  • अशोकवन - नागपूर
  • लोकबिरादरी प्रकल्प - नागेपल्ली
  • लोकबिरादरी प्रकल्प - हेमलकसा

बाबांनी आनंदवनाच्या मूळच्या खडकाळ जमिनीत शेतीविषयक विविध प्रयोग केले. ते राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते होते. .. १९८५ साली शंभर दिवसांच्या भारत जोडो आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. मेधा पाटकर यांच्या सोबत ते नर्मदा बचाव आंदोलनातही सक्रिय होते. सामाजिक पर्यावरण क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांचे पुत्र प्रकाश आमटे विकास आमटे, त्यांच्या सुना नातु आमट्यांनी आरंभलेले कार्य पुढे नेत आहेत.

 साहित्

बाबांनी खालील पुस्तके लिहिली आहेत :

  • 'ज्वाला आणि फुले' - कवितासंग्र
  • 'उज्ज्वल उद्यासाठी' (काव्य)
  • 'माती जागवील त्याला मत'

 पुरस्का

आंतरराष्ट्री

  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार
  • डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका - .. १९८३ .कुष्ठरोग्यांप्रीत्यर्थ कार्यासाठी दिला जाणारा अत्युच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार .
  • संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार .. १९९
  • आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका .. १९८
  • टेंपल्टन् बहुमान,अमेरिका (मानवतावादी कार्यासाठी) .. १९९
  • पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर .. १९९
  • पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .. १९९
  • राईट लाईव्हलीहूड अवार्ड, स्वीडन - .. १९९१. (पर्यायी नोबल पुरस्कार) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्या सोबत संयुक्तपणे

भारती

  • पद्मश्री .. १९७
  • पद्मविभूषण .. १९८
  • अपंग कल्याण पुरस्कार .. १९८
  • महाराष्ट्र सरकारचा सावित्री बाई फुलॆ पुरस्कार .. १९९
  • गांधी शांतता पुरस्कार .. १९९
  • सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार .. १९९
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार २००४ (महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च सन्मान) मे, .. २००५ रोजी त्यांना आनंदवन येथे देण्यात आला.

इत

  • मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार .. १९८
  • पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार .. १९८
  • महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार .. १९७
  • राष्ट्रीय भूषण पुरस्कार .. १९७
  • जमनालाल बजाज पुरस्कार .. १९७
  • एन डी दिवान पुरस्कार .. १९८
  • राजा राम मोहनराय पुरस्कार .. १९८
  • भरतवास पुरस्कार .. २००
  • जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार .. १९८
  • महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार .. १९९
  • कुमार गंधर्व पुरस्कार .. १९९
  • जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक .. १९९
  • गौरव डि.लिट् - नागपूर विद्यापीठ .. १९८
  • गौरव डि.लिट् - पुणे विद्यापीठ, .. १९८५-
  • देशिकोत्तम (गौरव डॉक्टरेट) .. १९८८ -विश्वभारती, शांतीनिकेतन , पश्चिम बंगाल


 

[दाखवा]
सं
मराठी कवी
अनंतफंदीअनिल
बाबा आमटेमुरलीधर देवीदास आमटे
निरंजन उजगरे
एकनाथ
अनंत काणेकरकिशोर कदमगोविंद विनायक करंदीकरविनायक जनार्दन करंदीकरमनोहर कवीश्वरमाधव गोविंद काटकरगोविंद वासुदेव कानिटकरकान्होपात्रामहादेव मोरेश्वर कुंटेदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णीवि..कुलकर्णीकृष्णदयार्णवमधुकर केचेमहेश केळुस्करवसंत कोकजेअरुण कोलटकरबाळ कोल्हटकरश्रीपाद कृष्ण कोल्हटकरवामन रामराव कांतज्योती कपिलेकल्याण स्वामीवामन रामराव कांतअरुण कांबळेदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णीभगवान रघुनाथ कुळकर्णीबाळकृष्ण हरी कोल्हटकर
संदीप खरेचिंतामणी त्र्यंबक खानोलकर
कवी गोविंदप्रेमानंद गज्वीगोविंदाग्रजगिरीश.. गोखलेग्रेसपद्मा गोळेमाणिक गोडघाटेराम गणेश गडकरीनारायण मुरलीधर गुप्ते
वि..घाटेदत्तात्रेय कोंडो घाटेविठ्ठल दत्तात्रय घाटे
सोपानदेव चौधरीबहिणाबाई चौधरी
इलाही जमादारमाधव जुलियनमनोहर जाधववामन गोपाळ जोशी
वसंत आबाजी डहाके
नामदेव ढसाळ
भा.रा. तांबेलक्ष्मीकांत तांबोळी