आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Tuesday 13 December 2016

माझा स्वप्नातील शाळा


असावी सुंदर अशी एक शाळा 
ओढ लागे जिची  प्रत्येक बाळा
असावा असा एक गुरु 
ज्ञानदानाचा असे तो कल्पतरू 
   
                 मनुष्याला माणूस म्हणून जगायला शिकवते ती संस्था म्हणजे शाळा. शाळा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे . आपण शिकतो ती शाळा किंवा  शिकलो ती शाळा आठवत नाही अस कुणी म्हणणार नाही. आपली शाळा प्रयेकाला आठवत असते . शाळेत केलेल्या गमती जमती , अन छान अंगणात , माळरानावर, किंवा दिव्याजवळ बसून केलेला अभ्यास सर्वाना आठवत असेल. माझ्या लहानपणी जि.प. च्या शाळेत शिकत असतानाच्या अनेक गोष्टींची आज आठवण येते . पहिलीच्या वर्गात बसताना डोळ्यातून गंगा जमुना वाहत असायच्या ते आजही चांगल आठवतंय . माझा पहिलीच्या वर्गात बसायला न जाता मी रोज माझ्या ताईच्या वर्गात बसायचो . अन मग माझा वर्गशिक्षिका सौ.लुबिना म्याडम मला उचलून माझा वर्गात नेत. त्यावेळी जर त्यांनी मला माझा वर्गाची ओढ लावली नसती तर कदाचित आज शाळेविषयी इतकी आपुलकी मला वाटली नसती. मी आज जे काही आहे त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणूनच आज २५ वर्षानंतरही त्यांना मी विसरलो नाही. 
                 आज काळ बदलतोय , शाळाही बदलत आहेत. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आजच्या खाजगी शाळा ... खूप तफावत निर्माण झालीय. मला २५ वर्षानंतरही आठवणाऱ्या माझा वर्गशिक्षिका आजच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षातच विसरायला होतात. कदाचित आजच जीवनमान गतीने चालू आहे हे कारण असेलही ,
पण ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं ज्यांनी आपल्याला चांगल्या वाईटाची ओळख करून दिली त्यांना आपण कसकाय विसरू शकतो हे मोठ कोडं आहे. 
                  असो मला फक्त इतकच म्हणायचं आहे , आपल्याला सन्मार्ग दाखवणाऱ्या शाळेला व शाळेतील शिक्षकांना कधीच विसरू नका . 

8 comments:

Anonymous said...

I don,t like it i think you forget the easy topic some where it is not good even at all

Anonymous said...

i dont ask about you and i am 13years old

vinod said...

तुम्ही निबंधाचा विषय काय लिहिला व आत काय लिहिले याचा ताळमेळ तरी ठेवा....

Unknown said...

Aapko thodi practice ki grvat he

Unknown said...

Hmm

TECHSBI said...

छान प्रयत्न !!!

Anonymous said...

डोके वापरून लिहा

Anonymous said...

Nice 👍 comments