आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 20 July 2013

“गुरुपोर्णिमा”--


               आषाढी पोर्णिमा
    नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे मने हिरवी असताना जी आषाढाची पोर्णिमा येते ती असतेगुरुपोर्णिमा”. गुरु पौर्णिमेचा काळ ठरवायचा तर महाभारतापर्यंत मागे जावे लागते. या दिवशी व्यास पूजा करायची प्रथा आहे.”महर्षी व्यासहे आद्य गुरु मानले जातात.महर्षी व्यास हे शंकराचार्याच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झाले अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्व ज्ञानाचा उगम व्यासापासून अशी धारणा आहे. व्यापक दृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. हि शक्ती गुरुपोर्निमेच्या मध्यरात्री फिरून कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरूच्या अंगी व्यासाचा अंश असतो असे मानून गृपोर्निमेच्या दिवशी गुरूला वंदन केले जाते. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला गुरूचा महिमा बोलका आहे... “सद् गुरुसारखा असता पाठीराखा....!इतरांचा लेखा कोण करी...!!”
काही नाती रक्ताची असतात. पण काही रक्तापेक्षाही  घटट असतात. त्यातलं एक मैत्रीच, दुसर गुरु-शिष्याच. आयुष्यात मित्र असेल तर सोन्याला सुगंध जणू... पण मित्र आयुष्याला अर्थ देईलच असे नाही. ते काम गुरुच. गुरु नेमक करतो तरी काय? तर गुरु दृष्टांत देतो. उत्कर्षाची वाट दाखवतो. आयुष्याला अर्थ देतो. संगीताच्या घराण्यात भास्कर बुवा वखले, भीमसेन जोशी यांनी गुरुकडे पडतील ती कामे केली. मुस्लीम गुरुकडे हिंदू शिष्य गुरुकुल पद्धतीने वाढले. शिष्योत्ताम्माना योग्य पातळीवर येण्यापूर्वी जे कराव लागल त्यालारेगिंगम्हणून कसं चालेल? तोच तर जीवनानुभव असतो आणि तो गुरु कडे मिळतो. कुठलीच विद्या स्वस्तात मिळत नाही. त्याच परंपरेत एकलव्य सारख्या धनुर्धाराला आपला अंगठा द्यावा लागला, तर विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला आपल्या गुरूच्या रक्षणासाठी युद्ध करावे लागले.
गुरुपोर्णिमा हा कोणता सण नाही जो साजरा करण्यासाठी गुरूला हार, फुले, फळ, पैसे किवा कपडे दिले जातात. तर ह्या पवित्र दिवशी खऱ्या मनाने गुरूलासाम, दाम, दीक्षा, उपरती, श्रद्धा, समाधान, विवेक, वैराग्य, मनःशांती, खरेपणा, उदारपणा, पवित्रपणा, चारित्र्य, चांगले वागणे आणि आत्मसमर्पण ह्यासारखी १५ प्रकारची फुले श्रद्धेने अर्पण केली जातात. गुरूला आपल्या संस्कृती मध्ये देवाचे स्थान दिले गेले आहे. ज्या आद्य शक्तीची ह्या दिवशी पूजा होते ते महर्षी व्यास म्हणजे महाभारताचे कवी, ज्यांनी खुद्द विद्यापती गणेशालाच लेखनिक बनवलं. “व्यासोचछीष्टमं जगत सर्वं !”असा ज्यांचा गौरव होतो त्या महान गुरूला, त्या आद्य शक्तीला माझा कोटी-कोटी प्रणाम !!!!!

आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत.

चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.

गुरूपौर्णिमा व्रत कसे कराल?
1. सकाळी घर साफ करा. स्नान करून सर्व कामे आटोपून घ्या.
2. एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करा.
3. त्यापूर्वी 'गुरूपरंपरासिद्धयर्थ व्यासपुजा करिष्ये' मंत्र जपा.
4. नंतर दहाही दिशांना अक्षता टाका.
5. आता ब्रम्हा, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करा.
6. नंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्या.

गुरूपौर्णिमेच्या दिवशी काय करावे?
1. यादिवशी केवळ गुरूच (शिक्षकच) नाही, तर आई-वडिल, मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
2. यादिवशी वस्त्र, फळ, फुले हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे. कारण गुरूचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो.
3. व्यासांनी रचलेल्या ग्रंथाचा अभ्यास-मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे.
4. हा सण म्हणजे अंधश्रद्धा नसून गुरूप्रती दाखविलेला विश्वास, आदर आहे.
संबंधित माहिती
मॉडेल ते संत- असाही एक प्रवास
सदगुरू धुंडामहाराज देगलुरकर
त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर
गुरुतत्वविवेचनम्
गुरुवर अष्टक


गुरु सिद्धांत आयुष्यात महत्वपूर्ण आहे. पहिला गुरु हा दक्षिणामूर्ती आहे. अनंताचे अवतार कुशाग्रतेने विणले गेले की परिमित आणि अनंतासोबत अस्तित्वात राहतात. गुरु तत्व हे सर्व मनुष्यात आहे. ती बुद्धिमत्ता प्रत्येकात लागू आणि जागृत करायला हवी.

 हे तत्व जेव्हा जागृत होते, आयुष्यातील कष्ट दूर होते. हे कष्टाचे औषध आहे, सर्व विद्येचे धन आहे.

 गुरवे सर्व लोकानाम- दिव्य चेतना हा पूर्ण जगाच्या जगतातली प्रमुख प्रकाश आहे.
 बिशाजे भव रोगीणाम - हे औषध आहे समाजातील रोग्यांसाठी, आयुष्यासाठी, दु:खीतांसाठी. हे सगळे कष्ट दूर करतो.
 निधाय सर्व विद्यानाम श्री दक्षिनामुर्तये नमः   - मी या चेतनेला शरण जातो जे माझ्या हृद्यात आहे.

 गुरु शब्दाचा अर्थ आज विशेषज्ञ म्हणून केला जातो - जसे व्यवसाय प्रबंधात विशेषज्ञ. गुरु म्हणजे असाधारण, मोठे. अर्थातच, विशेषज्ञ हा त्याचा एक भाग झाला. या सगळ्यात पूर्णता आहे. गूढता आहे. आपल्या चेतनेत, बुद्धिमत्ता तेव्हाच आयुष्यात येते जेव्हा गुरु तत्व आयुष्यात असते.जेव्हा आपल्या आयुषयात काहीच इच्छा आकांश नसतात, तेव्हा गुरु तत्व आयुष्यात येते. तुम्ही कधी कुणासाठी काही करण्याची इच्चा केली आहे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा करता? मग तुम्ही गुरु होण्याची भूमिका पार पाडली.आई ही पहिली गुरु आहे. मग आपले शिक्षक येतात - विना शिक्षक  आणि इतर अनेक. सदगुरु सत्याचे ज्ञान,अंतिम वास्तविकता, अध्यात्मिक ज्ञान देतो.
 गुरुपोर्णिमेला प्रत्येकाने चिंतन करावे, " मी कुठे होतो हे ज्ञान मिळण्यापूर्वी? मी आता कुठे आहे?" तुम्ही जेव्हा विपरीत बघता तुम्ही या ज्ञानाशिवाय कुठे होतात, तर आभार व्यक्त होतो.
 या पोर्णिमेला व्यास पोर्णिमा देखील म्हटले जाते. व्यासांनी ही ज्ञानाची विद्या वेदात श्रेणी बद्ध केली आहे, उपनिषद, उपवेद, २७ स्मृती, २७ उपस्मृती - एक मोठ्ठी ज्ञानाची विद्या जीवनाच्या प्रत्येक बाबींशी संबंधित आहेत आयुर्वेद ते वास्तुशास्त्र ते चिकित्सा ते औषध.ही पोर्णिमा त्यांच्या नावावर आहे.

 हा दिवस आपण त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवतो ज्यानी मानव जातीच्या भल्यासाठी काम केले आहे . आपण लक्षात ठेवतो त्यांनी काय केले.
 तुम्ही किती नशीबवान आहात तुमच्या आत अनंत अनुभव आहेत. या विशिष्ट साच्यात शरीर आणि मन जडलेला आहे. शरीर आणि मन सीमित आहेत पण भावनेची अभिव्यक्ती अनंत आहे.
 साधकासाठी, नवीन वर्ष म्हणजे गुरुपोर्णिमा आहे. जेव्हा बाकीच्या जगासाठी ही अर्धी वाट असते, आम्ही अध्यात्मिक मार्गावर पूर्ण वर्ष साजरा करतो. आपल्या जीवनात दिव्य अभिव्यक्तीच, दिशेचं एक वर्ष आहे. एक वर्ष एकरूपतेची भावना आणि जगाला गुरूच्या चक्षूने बघणे. गुरू हा मार्गदर्शन करणारा आहे. मला ते करू द्या जे एका गुरुने, एका भल्या माणसाने या परिस्थितीत केले असते. बुद्धिमान व्यक्ती कधी प्रतिक्रिया देणार नाही. ते उत्तर देतील. तुम्ही शिकाल जेव्हा स्वतःला  त्या जागी ठेवाल (गुरु किंवा बुद्धिमान व्यक्ती) पुन्हा पुन्हा अनंत धेय्याचे प्रयत्न, विशाल बुद्धिमत्ता, पूर्ण दया आणि आनंद.

 कुणालाच माहित नाही ही प्रथा कधी सुरु झाली. करोडो वर्षांपूर्वी, या पृथ्वीवर, किती सारे संत आणि ऋषी होऊन गेले आणि किती तरी पुढे भविष्यात होतील. आपण त्या सगळ्यांचे ज्ञानाच्या योगदानासाठी  भूतकाळात, वर्तमानात, आणि भविष्यात आभार मानतो. बुद्धीमत्तेशिवाय हे जगणे नाही, फक्त आहेच. आयुष्याची सुरुवात बुद्धिमत्तेने होते.

 या गुरुपोर्णिमेला तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले त्याबद्दल विचार करा आणि आभार व्यक्त करा. सगळे गाऊ या आणि आंतरिक आनंदात डुबून जाऊया.


GURU is Shiva without his three eyes!
Vishnu without his four arms! Brahma without his four head!
He is Param-Shiva himself in Human Form!!!




                                    ---vivek shelke                  

No comments: