आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 2 May 2014

सुविचार संग्रह -2

१.एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

२.सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.

३.परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

४.मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

५.खिडकी म्हणजे आकाश नसतं.

६.आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

७.बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

८.जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

९.मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

१०.भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

११.वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

१२.कविता म्हणजे भावनांचं चित्र!

१३.संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

१४.तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

१५.ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

१६.स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

१७.अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

१८.तुलना करावी पण अवहेलना करू नये.

१९.समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.

२०.आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

२१.मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

२२.चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

२३.व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा

२४.आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

२५.तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

२६.अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

२७.विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

२८.मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

२९.आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

३०.आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

३१.प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.

३२.तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

३३.सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

३४.काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.

३५.लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

३६.चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

३७.तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

३८.भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

३९.चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

४०.आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

४१.उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

४२.पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

४३.अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

४४.मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

४५.संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

४६.रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

४७.अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

४८.अंथरूण बघून पाय पसरा.

४९.कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.

५०.तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

सुविचार संग्रह -१

१. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी       राहतात.

२ .सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

३.मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

४.आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते

५.छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

६.प्रार्थना म्हणजे मनाचं स्नान.

७.आपण जे पेरतो तेच उगवतं.

८.जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.

९.फळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

१०.यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

११.उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

१२.प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे

१३.शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

१४ .ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

१५.प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फक्त परमेश्वरावरच ठेवा.

१६.यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती - आत्मविश्वास.

१७.आधी विचार करा, मग कृती करा.

१८.प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

१९. आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.

२०.चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

२१.फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

२२.एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

२३.माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

२४.अतिथी देवो भव ॥

२५.सत्याने मिळतं तेच टिकतं.

२६.अपयशाने खचू नका, अधिक जिद्दी व्हा.

२७.जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

२८.दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा.

२९.परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

३०.आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

३१.हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !

३२.निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

३३.स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

३४.खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

३५.प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

३६.उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

३७.खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

३८.चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

३९.तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

४०.वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

४१.नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

४२.जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

४३.तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

४४.गर्वाचं घर नेहमीच खाली असतं

४५.शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

४६.झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

४७.मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

४८.माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.

४९.आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

५०.क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.


Thursday 1 May 2014

सामान्य ज्ञान

१. भारताचा भाजीपाला उत्पादनामध्ये जगात , दुसऱ्या क्रमांक आहे आणि चीनचा प्रथम क्रमांक आहे.

२. भारतात ६.५ दशलक्ष हेक्टर क्षेत्र भाजीपाला पिकाखाली असून त्यामधून ७१.६६ दशलक्ष टन उत्पादन               मिळते .

३. नाशिकचा कांदा , टोम्याटो सगळीकडे लोकप्रिय आहेत .

४. महाराष्ट्रातील एकूण १२२ दशलक्ष क्षेत्रफळापैकी २२ लाख हेक्टर क्षेत्रावर वेगवेगळ्या पिकांची लागवड होते
    त्यापैकी २.५ लाख हेक्टर २२ ते २४ वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला पिके घेतली जातात .

५. इंडो -अमेरिकन हायब्रीड सीड्स हि कंपनी १९७३ पासून भाजीपाला पिकांचे नवीन वाण आणि एफ -१  संकरीत जाती तयार करण्याचे काम करीत आहे .  

उपक्रम - व्यक्तिमत्त्व विकास इयत्ता ९ वी

 १. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करा .
 २. उत्तम आत्मचरित्रे वाचन करून  एखादे आत्मचरित्र का आवडले हे थोडक्यात लिहून वर्गात इतर  
     विद्यार्थ्यांना सांगा.
 ३. सार्वजनिक स्वच्छतेसाठी घोषवाक्ये तयार करा .
 ४. तुमच्या वर्गातील विविध धर्मीय मित्र मैत्रिणींच्या उत्सवांची माहिती मिळवा .
 ५. थोरा - मोठ्यांच्या विचारांचा , सुभाषितांचा संग्रह तयार करणे .
 ६. 'सत्य' हे मूल्य संस्कारित करणाऱ्या बोधकथा सांगणे .
 ७. दररोज दैनंदिनी लिहिणे , तिचे परिपाठात वाचन करणे .
 ८. प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या मित्रांचा गौरव करणे .
 ९. सद्विचार , म्हणी , सुभाषिते वर्गखोलीत लिहिणे .
 १०.महात्मा गांधींच्या अहिंसा तत्वावर आधारित काही कथा सांगणे .

व्यक्तिमत्व म्हणजे काय ?

                  व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात .त्यातील काही गुण इतरांसारखे असतात , तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे असतात . या वेगळ्या गुणांमुळे ती व्यक्ती ओळखता येते . म्हणून , व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील विविध गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्णसंच होय .

    व्यक्तिमत्व विकास हि एक व्यापक संकल्पना आहे . या संकल्पनेची महत्वाची पाच अंगे खालीलप्रमाणे - १) शारीरिक विकास
२) भावनिक विकास
३) बौद्धिक विकास
४) सामाजिक विकास
५) आत्मिक विकास


                                                                                                   - विवेक शेळके    

Wednesday 30 April 2014

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० ला करण्यात आली. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्‍तर महाराष्ट्र, विदर्भ हे महाराष्ट्राचे प्रमुख विभाग. स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ब्रिटीशांनी भारतावर राज्य करण्यासाठी भारताचे विविध भाग पाडले होते. ही विभागणी त्यांनी भाषेप्रमाणे केलेली नव्हती, पण मा. गांधी, लो. टिळक हे भाषावार प्रांत रचनेचे पुरस्कर्ते होते. पण स्वातंत्र्या नंतर पंडित नेहरुंना मुंबई महाराष्ट्राला दयायला विरोध होता व त्यांना मुंबईतील अमराठी भांडवलदारांचा पाठिंबा होता. स्वातंत्र महाराष्ट्र निर्मिती साठी कॉंग्रेसचे पुढारी काहीही पाऊले उचलत नसल्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्राच्या एकिकरणाचा विषय १९३८ साली पटवर्धन व १९४० मध्ये ग. त्र्यं. माडखोलकर यांनी उपस्थित केला. पुढे १९४६ च्या साहित्य संमेलनात माडखोलकरांच्या अध्यक्षते खाली 'संयुक्‍त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली.
दार कमिशनने भाषावार प्रांत रचनेस विरोध दर्शविला व महाराष्ट्रीयांवर अपमानास्पद टिका केली. त्यांनी मुंबई हे मिश्र वर्णाच्या लोकांचे ठिकाण आहे, असे म्हटले होते. विदर्भासह महाराष्ट्र, सौराष्ट्रासह गुजरात व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना पं. नेहरुंनी जाहीर केली तेव्हा महाराष्ट्रापासुन मुंबई तोडण्याची भावना मराठीजनांत पसरली. याच कारणास्तव संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला व 'मुंबईसह संयुक्‍त महाराष्ट्र झालाच पाहीजे' हे ह्या चळवळीचे घोषवाक्य बनले.
आचार्य अत्रे, सेनापती बापट, शाहिर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, एस. एम. जोशी या व्यक्‍तिंनी संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्‍व केले. मोरारजी देसाई व स. का. पाटील या नेत्यांनी या चळवळीला दडपण्याचा प्रयत्‍न केला. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले व २१ नोव्हेंबर १९५५ रोजी पोलिसांच्या गोळीबारात १५ जणांना प्राण गमवावे लागले. जनतेच्या असंतोषाला न जुमानता सरकारने मुंबई केंद्रशासित केल्याची घोषणा केली. या निर्णयाने चळवळीला आणखीनच बळ मिळाले. मोर्चे, सत्याग्रह सुरु झाले. या चळवळीच्या काळात भारताचे त्यावेळचे अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणा-या अन्यायाच्या निषेधार्थ राजीनामा देऊन चळवळ अधिक मजबूत केली. या चळवळीत एकूण १०५ जणांना हौतात्म्य प्राप्‍त झाले. मुंबईच्या फ्लोराफाउंटन भागात त्यांच्या स्मरणार्थ 'हुतात्मा स्मारक’ उभारले गेले. पुढे सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई मिळुन एक द्विभाषिक राज्य स्थापन केले गेले. पण त्याला सर्व जनतेने विरोध केला. अखेर निवडणुकींना सामोरे जायचे असल्याने लोकांचा रोष ऒढवून घेऊन चालणार नाही. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्‍वाने एक पाऊल मागे घेऊन संयुक्‍त महाराष्ट्रासाठी ते राजी झाले. पुढे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई राजधानी व नागपुर ही उपराजधानी म्हणून निश्चित झाली. या स्वातंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. १०५ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपण मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणुन पहात आहोत.
असा हा आपला महाराष्ट्र दिन.

महाराष्ट्र राज्य

       भारतीय संघराज्यातील २२ राज्यां पैकी एक प्रमुख राज्य. क्षेत्रफळ ३,०७,७६२ चौ. किमी. लोकसंख्या ६,२७,१५,३०० (१९८१). क्षेत्रफळाच्या बाबतीत मध्य प्रदेश व राजस्थान राज्यांखालोखाल आणि लोकसंख्येच्या बाबतीत उत्तर प्रदेश व बिहार या राज्याखालोखाल महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या ९.३७% क्षेत्रफळ महाराष्ट्राने व्यापले असून लोकसंख्याही देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ९.१६% आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १५° ४८' उ. ते २२° उ. व ७२° ३६' पू. ते ८०° ५४पू. यादरम्यान आहे. भारतीय द्वीपकल्पाचा बराच मोठा भाग महाराष्टाने व्यापलेला आहे. राज्याच्या पश्चिमेस अरबी   समुद्रवायव्येस गुजरात राज्य आणि दाद्रा व नगरहवेली हा केंद्रशासित प्रदेशउत्तरेस व पूर्वेस मध्य प्रदेश,अग्नयीस आंध्र प्रदेशदक्षिणेस कर्नाटक ही राज्ये व गोवा केंद्रशासित प्रदेश आहे. राज्याचा आकार अनियमित असलातरी तो साधारणपणे काटकोन त्रिकोणी असल्याचे दिसते. पश्चिमेकडील उत्तर-दक्षिण असा ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा म्हणजे काटकोन त्रिकोणाचा पाया असून येथून पूर्वेस ८०० किमी. अंतरावरील राज्याचे पूर्व टोक म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा शिरोबिंदू होय.

हाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. मुंबई (लोकसंख्या ८२,२७,३३३-१९८१ही राज्याची राजधानी असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर शहरी भरते. देशातील कृषी व औद्योगिक उत्पादनव्यापारवाहतूकशैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती इ. बाबतींत महाराष्ट्र राज्य अग्रेसर समजले जाते.


या नोंदीत महाराष्ट्र राज्यासंबंधीची माहिती पुढील प्रमुख विषयानुक्रमाने दिली आहे व आवश्यक तेथे उप आणि उपउपविषय अंतर्भूत केले आहेत : (१) ‘महाराष्ट्र’ या नावाची व्युत्पत्ती व अर्थ, (भूवैज्ञानिक इतिहास, (भूवर्णन, (मृदा, (नैसर्गिक साधनसंपत्ती, (जलवायुमान, ()वनश्री, (प्राणिजात, (इतिहास, (१०राजकीय स्थिती, (११विधी व न्यायव्यवस्था, (१२आर्थिक स्थिती, (१३लोक व समाजजीवन, (१४)शिक्षण, (१५भाषा व साहित्य, (१६वृत्तपत्रसृष्टी, (१७ग्रंथालय, (१८ग्रंथप्रकाशन, (१९कला, (२०हस्तव्यवसाय, (२१संग्रहालये, (२२)रंगभूमी, (२३चित्रपट, (२४खेळ व मनोरंजन आणि (२५महत्त्वाची स्थळे.

रील प्रमुख विषयांच्या विवेचनात अनेक ठिकाणी बाणांकने करून, तसेच चौकटी कंसांतील पूरक संदर्भ देऊन महाराष्ट्रासंबंधी विश्वकोशाच्या एकूण १७ खंडांतस्वतंत्र नोंदींच्या रुपाने आलेले विषय दाखविले आहेत. भारत’ आणि महाराष्ट्र’ यासंबंधीची जास्तीतजास्त सर्वांगीण व अद्ययावत् माहिती आवश्यक त्या त्या नोंदीखाली देण्याचा विश्वकोशात प्रयत्न केलेला आहे. पिकेउद्योगधंदेशक्तिसाधनेनैसर्गिक साधनसंपत्तीललित कलारंगभूमी,चित्रपटखेळ यांसारख्या विषयांवरील स्वतंत्र नोंदींतूनकधीकधी स्वतंत्र उपविषय करूनहीमहाराष्ट्रासंबंधी अधिक माहिती दिली आहे. एवढेच नव्हे,तर भारतातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्र राज्या’ वरील नोंद अधिक विस्ताराने दिलेली आहे.

जिज्ञासू वाचकाला महाराष्ट्रासंबंधी अधिक माहिती विश्वकोशातील पुढी निर्देशिलेल्या विषयांच्या इतर नोंदींतूनही मिळू शकेल.

(महाराष्ट्रातील सर्व जिल्हेजिल्ह्यांची प्रमुख ठिकाणेतसेच ऐतिहासिक-राजकीय-सांस्कृतिक-औद्योगिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे;कोकणमराठवाडाविदर्भ इ. विभागमहत्त्वाच्या नद्यापर्वतशिखरेसरोवरेधरणे इत्यादी.

(सातवाहनराष्ट्रकूटयादवबहमनीमराठा इत्यादींच्या राजवटीमराठ्यांची युद्धपद्धतीभोसले घराणेपेशवेखर्ड्याची लढाई यांसारखे इतिहासदृष्ट्या महत्त्वाचे विषयछत्रपती शिवाजी महाराजलोकमान्य टिळक इ. महत्त्वाच्या व्यक्तीमराठा रेजिमेंटमहार रेजिमेंटकोल्हापूर संस्थान,इतिहास-प्रसिद्ध किल्ले व पुरातत्त्वीय उत्खनन स्थळे (उदा.तेरदायमाबादनेवासे इ.) इत्यादी.

(महाराष्ट्र राज्य शासनाचे महत्त्वाचे निगम किंवा महामंडळेऔद्योगिक क्षेत्रातील किर्लोस्कर घराणेमहत्त्वाचे प्रकल्प इत्यादी. 

(महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आदिवासी जमातीधार्मिक पंथोपपंथमहत्त्वाचे सणउत्सवयात्रादेवदेवतासत्यशोधक समाजप्रार्थनासमाज,मुस्लिम सत्यशोधक समाज इ. सामाजिक चळवळी. 

(महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठेमहत्त्वाच्या शैक्षणिक व संशोधनपर संस्था (गोखले अर्थशास्त्र संस्थाभांडारकर प्राच्याविद्या संशोधन मंदिर) इत्यादी. 

(याच खंडात मराठी साहित्य’ या विषयावर स्वतंत्र विस्तृत नोंद आहेत्यामुळे महाराष्ट्रावरील या नोंदीत हा विषय पुनरावृत्त करण्याचे टाळले आहे. कोकणी आणि हिंदी या भाषांतील महाराष्ट्रातील साहित्यनिर्मिती थोडक्यात दिली आहे. महाराष्ट्रातील भाषा  हाही विषय थोडक्यात दिला आहे. महत्त्वाचे मराठी साहित्यिकवैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकार-उदा.पोवाडाभारूलावणीबखरमहानुभाववारकरी इ. महत्त्वाचे संप्रदायमराठी साहित्यसंमेलने इत्यादींवर अकारविल्हे स्वतंत्र नोंदी आहेत. 

(नाट्यसंगीतकीर्तनभजन यांसारखे संगीतप्रकारदख्खनी कलाअजिंठावेरूकार्ले-भाजे इ. लेणीहेमाडपंती वास्तुशैलीसंगीत-नाट्य-चित्रपट क्षेत्रांतील प्रख्यात व्यक्तीदशावतारी खेळतमाशाबहुरूप खेळ इ. लोकरंजनप्रकारप्रभात फिल्म कंपनीमहाराष्ट्र फिल्म कंपनी इ. चित्रपटसृष्टीतील संस्था. 

(मल्लखांबलेझीमकबड्डीखोखोगंजीफा इ. खेळांचे प्रकारशिवछत्रपती पुरस्कार इत्यादी. 

व्युत्पत्ती व अर्थ 
'महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ यांबद्दल विद्वानांत एकमत नाही. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये दक्षिणापथ या संज्ञेचा वापर जास्त आढळून येत असून नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या मोठ्या भागाचा दक्षिणापथ असा निर्देश केला जात असे. सातवाहनांच्या शिलालेखांत दक्षिणापथाचा उल्लेख येतो. यावरून असे दिसते कीमहाराष्ट्र या संज्ञेचा वापर नंतरच्या काळामध्ये सुरू झाला असावा. इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांमध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा आढळ पहिल्यांदा दिसून येतो.महाराठी   ’ या शब्दाचा वापर सातवाहनांच्या लेखांतत्याचप्रमाणे त्यांच्या उत्तरकाळातील काही नाण्यांवर आढळून येतो. महावंसया बौद्धग्रंथात महारठ्ठ’ या शब्दाचा उल्लेख आहे. या ग्रंथातील निर्देशानुसार बौद्ध भिक्षू मोगली पुत्र तिस्स याने इ.स.पू. तिसऱ्या शतकात महिसमंडळबनवासीअपरांतकमहारठ्ठ येथे बौद्ध धर्मोप्रदेशक पाठविले होते. यावरून महारठ्ठ हे नाव इ.स.पू. तिसऱ्या शतकापासून रूढ असावे. रविकीर्तीच्या लेखात चालुक्यवंशीय दुसरा पुलकेशी हा तीन महाराष्ट्रकांवर राज्य करीत होताअसे उल्लेखिलेले आहे. ऐहोळे शिलालेखात (इ.स. ६३४उल्लेखिलेली ही तीन महाराष्ट्रके कोणती याबद्दल निश्चित उलगडा होत नाही. काही विद्वानांच्या मते विदर्भ, ⇨कुंतल आणि महाराष्ट्र अशी तीन वेगवेगळी महाराष्ट्रके असू शकतील. या तीन भागांपैकी विदर्भाचा उल्लेख सर्वात  प्राचीन आहे. रेय ब्राह्मण या ग्रंथानुसार जंगले आणि भयानक कुत्र्यांसाठी विदर्भ प्रसिद्ध होता. विदर्भाचे यानंतरचे उल्लेख बृहदारण्यकआणि जैमिनीयोपनिषद ब्राह्मण यांमध्ये आलेले आहेत. जैनबौद्ध आणि ब्राह्मणी वाङ्मयांतत्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्राचीन उत्कीर्ण लेखांत ऋषिक,अश्मकदण्डककुंतल, ⇨अपरांत आणि मूलक इ. विभागांचा दक्षिणापथाच्या संदर्भात उल्लेख आलेला आहे. विदर्भात नागपूरभंडाराचंद्रपूरवर्धा आणि यवतमाळ या सध्याच्या जिल्ह्यांचा समावेश होत होता. अपरांतामध्ये सर्वसाधारणपणे सध्याच्या उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरात यांचा समावेश होतातर राहिलेले इतर विभाग गोदावरीच्या खोऱ्यामध्ये सर्वसाधारणपणे सामावलेले होते. [ कोकणमराठवाडाविदर्भ]. 
  
जॉन विल्सन यांनी मोल्सवर्थच्या कोशात महाराष्ट्र म्हणजे महार+राष्ट्र = महारांचे राष्ट्र अशी एक लोकवाचक व्युत्पत्ती सुचविली आहे. महाराष्ट्रात महार वस्ती पुष्कळ असल्याने हे नाव पडले असावे. ओपर्ट हेही ह्या व्युत्पत्तीशी सहमत दिसतात. मात्र येथे महार शब्दाच्या व्युत्पत्तीचे विश्लेषण दिलेले नाही. लोकांच्या नावावरून प्रदेशास नाव दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. टॉलेमीने महारांना परवारी’ असे म्हटले आहे. ते आर्य संस्कृतीच्या कक्षेबाहेरचे असून तेसुद्धा मराठ्यांना आर्य म्हणून ओळखतात. आर्यला कानडीमध्ये आरे’ असे संबोधले जाई. यावरून अरिअके’ असे या प्रदेशाला म्हटले असावे. एरियन याने आपल्या इंडिका ग्रंथात मराठ्यांच्या प्रदेशास अरियके असे संबोधले आहे. 

पर्ट यांनी भारतवर्षातील मूळ रहिवासी’ या शीर्षकार्थाच्या ग्रंथात महाराष्ट्रालाच मल्लराष्ट्र (मल्ल लोकांचे राष्ट्र) असे म्हटले आहे. मल्ल म्हणजेच मार आणि मार लोकांनाच म्हार म्हणतात. मार या शब्दाचे हळूहळू म्हार-महार असे रूप बनले असावे. मराठीत ही दोन्ही रूपे आढळतात. तेव्हा मल्लराष्ट्र व महाराष्ट्र हे एकाच अर्थाचे दोन शब्द प्रचारात होते. महाराष्ट्रात आज तरी मल्ल लोकांचा संदर्भ लागत नाही. मात्र पूर्वी मल्ल जातीचे लोक महाराष्ट्राच्या आसपास असावेत. वि. का. राजवाडे यांनी नमूद केलेल्या मळवलीमालेगावमल्याणमळसर, मळगावमलांजनमळखेडेमळवाणमलोणी या मल्लराष्ट्र जातिसंबद्ध गावांचा याला आधार मिळतो. 

हाराष्ट्र शब्दाचा उल्लेख वररुचीच्या प्राकृतप्रकाश नावाच्या व्याकरण ग्रंथात आणि वात्स्यायनभरतमुनी यांच्या ग्रंथामध्येही आलेला आहे.मार्कंडेयपुराणवायुपुराण व ब्रह्मपुराणातही महाराष्ट्र नाव सापडते. श्रीधर वर्म्याची सेनापती सत्यनाग याच्या इ.स. ३६५ मधील शिलालेखात त्याने स्वतःला महाराष्ट्र-प्रमुख असे म्हटले असून महाराष्ट्र देशाचा उल्लेख असलेला हा आद्य कोरीव लेख सागर जिल्ह्यातील एरण गावी आहे. वराहमिहिरदंडी व राजशेखर यांच्या संस्कृत ग्रंथांमध्येही महाराष्ट्राचा उल्लेख अनेकदा आलेला दिसतो. 

चि. वि. वैद्य यांच्या मते इ. स. पू. ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्रमल्लराष्ट्रपांडुराष्ट्र इ. वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतोते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले. 

शोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच रास्टिक असे म्हटले असून त्याचेच संस्कृत रूप राष्ट्रिक’ झालेअसे रा. गो. भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहासविषयक ग्रंथात म्हटले आहे. अशोकाच्या शिलालेखात एके ठिकाणी महाभोज’ असा उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणवून घेततसेच या प्रदेशात रहाणाऱ्या राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक किंवा महारट्ट’ असे म्हणवून घेतले आणि ते ज्या देशात रहातत्या देशाला महारट्ट व संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव पडले. 

राजारामशास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा मरहठ्ठ’ हा जनवाचक शब्द ऱ्हाठा’ शब्दाची प्रकृती दिसतो. ऱ्हाठा’ म्हणजे मरता तब हटता’ (मरतो तेव्हा हटतो) अशी त्यांनी मरहठ्ठ शब्दाची लोकगुणवाचक व्यत्पत्ती सांगितली आहे. त्यांच्या मते मराठ्यांचा वीरश्री संदर्भ घेतलातर ही व्युत्पत्ती खरी वाटते. परंतु मराठ्यांचा गनिमी कावा लक्षात घेताही व्युत्पत्ती वस्तुस्थितीला धरू न आहे असे वाटत नाही. वि. का. राजवाडे हे आपल्यामहाराष्ट्राचा वसाहतकाल या प्रबंधात महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती रट्ट शब्दावरून झाल्याचे सुचवितात. मात्र रट्ट लोकांविषयी ते कोणकोठलेत्यांचा वर्ण,जाती यांबद्दल कसलीच माहिती मिळत नाही. रट्ट या शब्दाचे संस्कृत रूप राष्ट्रिक म्हणजे राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा मनुष्य. वर्णाने क्षत्रिय व पिढीजात पेशाने देशाधिकारी असा या राष्ट्रिकांचा किंवा रट्टांचा दर्जा असे. देसाईदेशमुखांच्याहून थोर अधिकाऱ्याला शे-दीडशे वर्षांपूर्वी सरदेसाईसरदेशमुख असे म्हणत. तसेच हजार-बाराशे वर्षापूर्वी राष्ट्रिकाहून उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रिक किंवा महारट्ट म्हणत. मोठा किंवा महत्तर प्रांत (मोठे राष्ट्र) म्हणजे महाराष्ट्र. या महत्तर राष्ट्रावरील (प्रांतावरील) जो अधिकारी तो महाराष्ट्रिक. महाराष्ट्रिकचा अपभ्रंश महारट्ट व महारट्टचा अपभ्रंश मऱ्हाट. अशा प्रकारे राजवाडे यांनी रट्टमहारट्टराष्ट्रिक व महाराष्ट्रिक यांपासून महाराष्ट्र आणि मराठे असा संदर्भ दर्शविला आहे. परंतु रट्ट लोक उत्तरेकडून दक्षिणेकडे वसाहतीस आल्याचा सबळ पुरावा मिळत नाही. 

ज्ञानकोशकार केतकर महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना महार आणि रट्ट यांच्या एकीकरणाची कल्पना मांडतात. त्यावरून केतकरांनाही ही लोकवाचक संज्ञा मान्य असल्याचे दिसते. 

म. म. पां. वा. काणे यांच्या मते महान राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. महाराष्ट्र हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून ते देशाच्या विस्तारावरून पडले असावे. प्राचीन काळापासून दख्खनच्या मधोमध एक प्रचंड अरण्य होते. त्याचा महाकांतार,महाटविदण्डकारण्य असा नामोल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतो. परंतु आर्यानी हा जंगलभाग साफ करून तेथे सर्वत्र गावेनगरे बसवून आर्य संस्कृतीचा विस्तार केला. अशा प्रकारे पूर्वीच्या महाकांतार किंवा महारण्याच्या ठिकाणी विस्तृत असे राष्ट्र झाल्याने त्याला महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागले. मात्र या परिवर्तनास अनेक शतके लोटली. साधारणपणे इ. स. पू. ३०० च्या सुमारास महाराष्ट्र हे नाव पडले असावे. तसेच प्राचीन काळी देशाच्या विस्तारावरून त्या प्रदेशाला तशी नावे पडल्याची उदाहरणेही मिळतात. ही व्युत्पत्ती अधिक ग्राह्य मानली जाते. 

या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव पडण्यापूर्वी याचे विदर्भ, ⇨अश्मककुंतलअपरांतगोपराष्ट्रमल्लराष्ट्रपांडुराष्ट्र असे घटक विभाग असून त्यांचे उल्लेख प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आलेले आढळतात. बृहदारण्यकोपनिषदरामायण व महाभारत यांतून विदर्भाचा उल्लेख अनेक वेळा आलेला आहे. गोदावरी नदीच्या तीरावरील प्रदेश तो अश्मक (राजधानी प्रतिष्ठान किंवा पैठण)कृष्णेच्या उगमाजवळचा अथवा त्याच्या पश्चिमेचा तो अपरांत म्हणजे कोकणगोपराष्ट्र म्हणजे नासिकभोवतालचा प्रदेश व त्याच्या दक्षिणेचा प्रदेश तो मल्लराष्ट्र असे मानले जाते. या सर्व प्रदेशांत प्राकृत भाषा प्रचलित होऊन त्या सर्वांचा मिळून एक मोठा प्रदेश निर्माण झाला व त्यालाच महाराष्ट्र असे संबोधले जाऊ लागलेअशीही व्युत्पत्ती दिली जाते. 

हाराष्ट्र-महारठ्ठ-रठ्ठ या नामचिकित्सेवरून या प्रदेशात रट्ट’ लोकांनी मूळ वसाहत केली असे दिसते. येथील मूळ लोकांचे मूळ नाव मरहट्टे-मऱ्हाटे-मराठी असे असावे. मरहट्ट’ हा शब्द कानडी असून झाडीमंडळ’ असा प्रदेशवाचक एक अर्थ व झाडीमंडळातील हट्टीजन’ (पशुपालन करणारे धनगर-गवळी) असा दुसरा लोकवाचक अर्थ होता. 

 'महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणोन महाराष्ट्र’ असा उल्लेख महानुभावी ग्रंथकारांच्या आचारमहाभाष्यातही मिळतो. 

भूवैज्ञानिक इतिहास 

भारतीय उपखंडाचे जे तीन प्राकृतिक विभाग आहेतत्यांपैकी द्वीपकल्प ह्या विभागात महाराष्ट्र राज्य येते. साहजिकच भूवैज्ञानिक संरचना,भूमिरूपविज्ञान (भूमिरुपांची वैशिष्ट्येउत्पत्ती व विकास ह्यांचे अध्ययन) व भूवैज्ञानिक इतिहास ह्या संबंधात भारतीय द्वीपकल्पाची असणारी सारी वैशिष्ट्ये महाराष्ट्रातसुद्धा दिसून येतात [ भारत (भूवैज्ञानिक इतिहास)]. तथापि महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा ज्वालामुखींपासून बनलेल्या बेसाल्टी लाव्ह्यांच्या थरांनी-काळ्या पत्थरांनी-व्यापलेला असून ते महाराष्ट्राचे खास भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आहे. निरनिराळ्या भूवैज्ञानिक कालखंडांमद्ये निर्माण झालेले खडक कोठे कोठे सापडतात व त्यांच्या अभ्यासातून कोणकोणते भूवैज्ञानिक निष्कर्ष निघतातह्याचा अभ्यास म्हणजेच एखाद्या भागाचा भूवैज्ञानिक इतिहास होय. आर्कीयन (आर्ष) महाकल्पात तयार झालेले खडक महाराष्ट्रात फारच थोड्या क्षेत्रात सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेकडील अगदी थोडासा भाग ह्या महाकल्पात निर्माण झालेल्या खडकांनी व्यापलेले असून नागपूरभंडारा जिल्ह्यांमध्येही काही भागांत आर्कीयन काळातील खडक सापडतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडणारे खडक हे धारवाडी संघाच्या गोव्यामध्ये आढळणाऱ्या कॅसलरॉक पट्ट्याचे उत्तरेकडील टोक असून अलीकडेच त्यांना बांदा माला’ असे नाव देण्यात आले आहेतर विदर्भातील नागपूर-भंडारा भागामध्ये सापडणारे खडक मध्य प्रदेशातील चिल्पी घाट पट्ट्याचा पश्चिमेकडील विस्तार आहे. याचे महाराष्ट्रामध्ये आल्यावर विभाजन होते व नागपूरकडील पट्ट्यास सौसर माला’, तर भंडाऱ्याकडील पट्ट्याससाकोली माला’ असे नाव आहे. बांदासौसर आणि साकोली या मालांमध्ये रुपांतरित (दाब व तापमान यांमुळे बदल घडून आलेले) खडक सापडतात. यांमध्ये मुख्यत्वेकरून फायलाइटक्वॉर्ट्झाइटअभ्रकी सुमाजा (सहज भंगणारा खडक) इ. खडकांचा समावेश आहे. मुळातले अवसादी (गाळाचे) खडक सागरी क्षेत्रात तयार झालेले असल्याने आर्कीयन कालखंडातील सागरी क्षेत्राचा विस्तार कोठपर्यंत झाला असावाही कल्पना येण्यास ह्या खडकांचा उपयोग होतो. या खडकांची निर्मिती होताना भूकवच आजच्याइतके जाड नव्हते त्यामुळे ह्या अवसादी खडकांमध्ये अनेक वेळा लाव्ह्याचे अंतःस्तरण झाले (थरांमध्ये थर तयार झाले). अवसादी खडकांचे रूपांतर होताना लाव्ह्यापासून निर्माण झालेल्या खडकांचेही रूपांतरण होऊन मेटॅडोलेराइट,अँफिबोलाइट इ. खडकांची निर्मिती झाली. हे खडक शेवटी गिरिजनक (पर्वतनिर्मितीच्या) हालचालींमुळे उचलले जाऊन त्यांचे घड्यांचे पर्वत बनले व त्यांचे सागरी क्षेत्रातून जमिनीत परिवर्तन झालेपण ह्याचमुळे त्यांची रचना अतिशय गुंतागुंतीची झाली व त्यांत शिलारसाची अंतर्वेशने (घुसण्याच्या क्रिया) होऊन ग्रॅनाइटगॅब्रो इ. अग्नज खडकांची निर्मिती झाली. बांदासौसर व साकोली मालांमधील खडकांमध्ये लोह व मँगॅनीज ह्यांच्या धातुकांचे (कच्च्या रुपातील धातूंचे) साठे सापडतात. [ आर्कीयनधारवाडी संघ]. 

वतमाळ जिल्ह्याच्या आग्नेय भागात व नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्येही ह्याच कालखंडामध्ये तयार झालेले ग्रॅनाइट व पट्टिताश्म अस्तित्वात आहेत. 

सुपुराकल्पामध्ये [आर्कीयननंतर ते सु. ६० कोटी वर्षांपूर्वीपर्यंतच्या काळामध्ये; ⟶ अल्गाँक्वियन] तयार झालेले खडकही असेच अगदी फार लहान क्षेत्रात आढळतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी भागात व फोंडा घाट भागात पिंडाश्मवालुकाश्मशेल इ. खडकांनी बनलेला भाग आहे. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात आढळणाऱ्या कलादगी मालेचेच हे भाग आहेत. असे मानतात. आंध्र प्रदेशातील कडप्पा संघाचे हे खडक समतुल्य आहेत. ह्यांचेच समतुल्य खडक म्हणजे आंध्र प्रदेशातील पाखाल मालेचे खडक होत. पाखाल मालेच्या खडकांपैकी काहींनी आंध्र प्रदेशालगतच्या सिरोंचा भागातील थोडे क्षेत्र व्यापले आहे. यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांत अगदी लहान क्षेत्रात चुनखडीवालुकाश्मशेल इ. खडकांनी बनलेल्या शैलसमूहास सुलावाई माला’ असे नामाभिधान आहे. ही माला सुपुराकल्पातील पण विंध्य संघाशी समतुल्य आहेअसे मानतातपण हेही खडक पाखाल मालेतीलच असावेत,असा तर्क काही भूवैज्ञानिकांनी अलीकडच्या काळामध्ये केला आहे. 

पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालाच्या) फार मोठ्या कालखंडामध्ये भारतीय द्वीपकल्पामध्ये खडकांची निर्मिती फारशी झालीच नाहीअसे म्हटले तरी चालेल. पर्मियन (सु. २७ ते २४.५ कोटी वर्षापूर्वीच्या) कालखंडाच्या सुरवातीला एक फार मोठे हिमयुग होऊन गेले व त्या वेळच्या हिमनद्यांच्या तोंडाशी हिमानी अवसाद (गाळ) सापडतात. त्यांचे दृश्यांश (भूपृष्ठावर उघडे पडलेले भाग) इतरत्र खूप असलेतरी महाराष्ट्रात त्यांचा आढळ केवळ कामठी कोळसा क्षेत्राच्या परिसरातील फक्त तीन छोट्या दृश्यांशांच्या रुपात अपवादात्मक रीतीनेच होतो. ह्या हिमानीअवसादांच्या निर्मितीनंतर काही विशिष्ट क्षेत्रात खचदऱ्या [खंदकासारख्या आकाराच्या दऱ्या; ⟶ खचदरी] निर्माण होऊन त्यांत नादेय व सरोवरी (नदीमुळे व सरोवरात बनलेल्या) अवसादांचे शैलसमूह तयार झाले. हिमानी अवसाद व त्यानंतर येणारे हे नादेय आणि सरोवी अवसाद ह्यांच्या शैलसमूहास गोंडवनी संघ असे नाव आहे. गोंडवनी संघाची कालमर्यादा बरीच मोठी म्हणजे पर्मियनपासून पूर्व क्रिटेशसपर्यंत (सु. २७ ते १४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) आहे. गोंडवनी संघाचे खडक महाराष्ट्रात नागपूरचंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत असून त्यांमध्ये दगडी कोळशांचे साठे सापडतात. 

ध्यजीव महाकल्पातील (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) क्रिटेशस कालखंड हा सागरी अतिक्रमणांचा कालखंड म्हणून प्रसिद्ध आहे. नर्मदा नदीच्या खोऱ्यात मध्य प्रदेश व गुजरात ह्या राज्यांत नर्मदेच्या उत्तरेस अशा अतिक्रमणांमुळे तयार झालेले सागरी खडक सापडतात व त्यास बाघ थर म्हणतात. बाघ थरांचे काही दृश्यांश नर्मदा नदीच्या दक्षिणेस धुळे जिल्ह्यातील अक्कलकुआ भागामध्ये सापडतात. 

बाघ थरांच्या निर्मितीनंतरपरंतु क्रिटेशस कालखंडामध्येच विदर्भ आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या भागामध्ये विस्तृत अशा सपाटमैदानी प्रदेशाची निर्मिती झाली व तेथे गोड्या पाण्यातील वालुकामय चुनखडकांची निर्मिती झाली. हे चुनखडक महाराष्ट्रमध्य प्रदेश व गुजरात येथे आढळतात व त्यांनालॅमटा माला म्हणतात. लॅमेटा मालेच्या खडकांमध्ये जबलपूर व पिसदुरा (जि. चंद्रपूर) येथे सापडणाऱ्या डायनोसॉर या प्रचंड सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवाश्मांचे (शिळारूप अवशेषांचे) साम्य ब्राझील व मॅलॅगॅसी येथे सापडणाऱ्या तत्कालीन खडकांच्या जीवाश्मांशी असल्याने खंडविप्लषाच्या कल्पनेस पुष्टी मिळते. लॅमेटा मालेतील खडकांचे दृश्यांश मात्र त्यावर येणाऱ्या दक्षिण ट्रॅपच्या भूभागाच्या सीमेपुरते मर्यादित आहेत. 

ध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी द्वीपकल्पातील जमिनीस लांबच लांब अशा भेगा पडून त्यांमधून बेसाल्टी लाव्ह्यांची उद्गिरणे झाली. लाव्ह्यांचे हे थर बहुधा क्षितिजसमांतर आहेत. पायऱ्यापायऱ्यांप्रमाणे दिसणाऱ्या या खडकांना स्विडीश ट्रॅपन या शब्दावरून ट्रॅप हे नाव पडले आहे व हे भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडे सापडतात म्हणून त्यांना दक्षिण ट्रॅप अशी संज्ञा आहे. ह्याच थरांमध्ये कोठे कोठे अंतःस्तरित असे गोड्या पाण्यातील अवसादी खडक सापडतात. त्यांस अंतरा-ट्रॅपी थर असे म्हणतात. महाराष्ट्रात असे थर विदर्भात (टाकळीनागपूरमधील सिताबर्डी टेकडी) व मुंबई शहरात आढळतात. या थरांमध्ये गोड्या पाण्यातील जीवसृष्टीचे अवशेष आढळतात. विदर्भातील अंतरा-ट्रॅपी थर हे क्रिटेशस कालखंडातील असून मुंबईतील अंतरा-ट्रॅपी थर पॅलिओसीन (सु. ६.५ ते ५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातील आहेत. असे त्यांत आढळणाऱ्या जीवाश्मांवरून वाटते. त्यामुळे मध्यजीव महाकल्पाच्या शेवटी शेवटी सुरू झालेला भूवैज्ञानिक इतिहासातील हा लाव्ह्यांच्या उद्गिरणांचा अध्याय नवजीव महाकल्पाच्या (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) आरंभीच्या काळापर्यंत सुरूच होताअसे म्हटले पाहिजे. 

या काळाच्या शेवटी भारतीय द्वीपकल्पाच्या हवामानामध्ये झालेला बदल जांभ्या दगडांच्या निर्मितीस पोषक ठरला. जांभा दगड कोकण पट्टीत सर्वत्र,सातारा व कोल्हापूर ह्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागांत विपुल सापडतो. [ जांभा].

हाराष्ट्रात अभिनव (गेल्या सु. ११ हजार वर्षांच्या) कालखंडामध्ये तापीगोदावरीपैनगंगावैनगंगा इ. नद्या व त्यांच्या काही उपनद्यांच्या पात्रांच्या दोन्ही बाजूंस जलोढाने (गाळाने) तयार झालेली जमीन आहे. ह्याच कालखंडामध्ये सागर किनारा उचलला गेल्याने कोकण किनाऱ्यावर सागरी चुनखडकांची निर्मिती झाली. चुनखडकाच्या या थरांची जाडी फारच कमी (५ मी. पेक्षाही कमी) आहे. ह्या चुनखडकांस कोकणातील लोक करळ’ असे म्हणतात.