आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 24 November 2012

maharashtratil jilhe- aurangabad

 
मराठवाडयाचं मुख्य केंद्र असलेलं औरंगाबाद हे प्राचीन व ऐतिहासिक दृष्टया महत्वाचे शहर आहे. मुर्तजा निझामशहा(दुसरा) याचा वजीर मलिक अंबर याने इ.स. १६१० मध्ये या शहराची निर्मिती केली. त्यावेळी या शहराचे नाव होतं 'खडकी' नतंर ते बदलुन फतेहखानने फत्तेपुर असे ठेवले. इ.स.१६३३ मध्ये शेवटचा मोगल बादशहा औरंगजेब याने हे शहर आपली राजधानी करून त्याला औरंगाबाद असे नाव दिलेे. तसेच संभाजी महाराज यांच्या नावाने म्हणजेच संभाजीनगर म्हणूनाही हे शहर ओळखले जाते.

प्रेक्षणिय स्थळे :

बीबी का मकबरा : औरंगाबादमधलं हे प्रमुख आकर्षन आहे. औरंगजेबची पत्नी रबिया दुरानी र्ऊफ दिलेरज्मबनो हीच्या कबरीवर उभारलेला 'बीबी का मकबरा' ही ताजमहलची हुबेहूब नक्कल आहे. म्हनुनच त्याला छोटा ताजमहाल असेही म्हणतात.
पवनचक्की : मकबर्‍यापासून जवळच शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व महसुद्र दरवाज्या नजिक ही पवनचक्की आहे. रशियातील गजदुबान शहरात राहणार्‍या बाबा शाह मुसाफीर याने इ.स. १७४४ मध्ये ही पवनचक्की बांधली.
गुहा : मकबर्‍याच्या मागील बाजुस डोंगरामध्ये बौध्द धर्माच्या अतिप्राचिन अशा बारा गुहा आहेत. या गुहा इ.स.६०० ते ८०० च्या दरम्यानच्या आहेत.
चैत्य व विहार : चैत्य भवनात पुजा व्हायची तर विहारात बुध्द भिक्षु राहत. पहिली गुहा अर्धीच आहे. तिथे भिंतीवर गौतमबुध्द व यक्षाच्या प्रतिमा आहेत. दुसर्‍या गुहेत बुध्दाची प्रसिध्द 'अभयमुद्रा' असलेली प्रतिमा मध्यभागी आहे.
खंडोबाचे मंदिर : औरंगाबादच्या दक्षिणेला असलेल्या खंडोबा सातारा या गावी शंकराचं अतिप्राचिन मंदिर आहे. त्यास लोक खंडोबाचे मंदिर असे म्हणतात. इ.स. १७११ मध्ये अहील्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधुन घेतले.
प्राणिसंग्राहलय : औरंगबादच्या मुख्य बसस्थानकापासून जवळच सिध्दार्थ उद्यान असुन त्यात प्राणि संग्रहालय असुन सर्पालय व मत्सालय हे त्याचे मुख्य आकर्षण आहे.
दौलताबद्रचा देवगिरी किल्ला :
औरंगाबदेच्या पश्चिमेला सुमारे १६ कि.मी. वर असलेले दौलताबाद एकेकाळी हिंदुस्थानची राजधानी होती. इथले मुख्य आकर्षण म्हणजे देवगिरी किल्ला. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला भीलम या पहिल्या यादव राजाने बांधला. मोहम्मद तुघलक दिल्लीच्या गादीवर आल्यानंतर त्याने देवगिरी हिंदुस्थानाची राजधानी देवगिरी केली.
खुल्दाबाद: औरंगबादच्या अवघ्या १० कि.मी. अंतरावर असलेल्या खुल्दाबाद इथे शहेनशहा औरंगजेबची कबर आहे.औरंगजेबच्या शेवटच्या इच्छेनुसार ख्वाजा जैनुद्दीन शैराजी यांच्या मकबर्‍याच्या आवारात ही कबर बांधण्यात आली.

maharashtratil jilhe- amaravati

 
बाबएककसंख्या
अमरावती जिल्हा

इतिहास:

१८५३ च्या कराराद्वारे हैदराबादच्या निजामाने अमरावती जिल्ह्यासहित सर्व बेरार (वर्‍हाड किंवा विदर्भ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपुर्द केला. कंपनीने वर्‍हाड प्रांताचे दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन केले.
  1. दक्षिण वर्‍हाड - त्याचे मुख्यालय हिंगोली येथे होते.
  2. पूर्व वर्‍हाड - उत्तर वर्‍हाडाचे रुपांतर पूर्व वर्‍हाडात करण्यात आले. त्याचे मुख्यालय अकोला येथे होते.
१८६४ मध्ये अमरावती मधून यवतमाळ जिल्हा वेगळा करण्यात आला. १९०३ मध्ये निजामाने वर्‍हाड ब्रिटिश भारत सरकारकडे कायमस्वरूपी सुपुर्द केला.(ईस्ट इंडिया कंपनीला तो काही कालावधीसाठीच देण्यात आला होता.) १९०३ मध्ये वर्‍हाड मध्यप्रांताला जोडण्यात आला. आणि मध्यप्रांत व बेरार असा मोठा प्रांत निर्माण करण्यात आला. तत्कालीन व्हाईसराय र्लॉड कर्झन याने वर्‍हाड मुंबई प्रांतास जोडण्यास नकार दिला. मराठी भाषिकांमध्ये प्रांतिक फूट पाडणे हा त्याचा हेतू होता. १९५६ मधील राज्य पुर्नरचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. १९६० मध्ये महाराष्ट्र्र व गुजरात वेगळा झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्र्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा दख्खनच्या पठारावर पूर्णपणे स्थानबद्ध आहे.
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असं सांगतात.
अमरावती जिल्हा हा महाराष्ट्र्रातील उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३.९८ टक्के क्षेत्र या जिल्हाने व्यापलेले आहे. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. विदर्भातील महत्वाचा, शैक्षणिक दृष्ट्या प्रगतिशील जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचं नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. १९४६ साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. अमरावती येथील अंबादेवीचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी मंदिर प्रवेश चळवळ सुरू केली. १९३२ साली त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय व शिवाजी शिक्षण समितीची स्थापना केली. शिवाजी शिक्षण समिती आज विदर्भातील अग्रणी शिक्षण संस्था आहे. १८९७ चे राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष सी. शंकरन नायर हे होते.
अमरावती जिल्ह्याला अकोला, यवतमाळ, वर्धा , अकोला आणि वाशिम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत. अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे तालुके संत्रयांसाठी प्रसिद्ध आहेत. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील अग्रगण्य संस्था आहे. स्वातंत्रयाच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे , वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.
अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.याच गावी हिंद सेवक संघाची शाखा होती.
भौगोलिक माहिती
स्थान
उत्तर अक्षांशअंश२०.३२ ते २१.४६
पुर्व रेखांशअंश७६.३७ ते ७८.२७
सरासरी पाऊसमिलीमीटर१५७०
क्षेत्रफळचौ. कि.मी.१२२१२
प्रशासकीय माहिती
ग्रामिण
तालुकेसंख्या१४
पंचायत समित्यासंख्या१४
ग्रामपंचायतीसंख्या८४०
खेडेसंख्या१९९६
शहरी
महानगर पालिकासंख्या
नगरपालिकासंख्या१०
लष्करी छावणीसंख्या-
शहरेसंख्या११
लोकसंख्या
ग्रामिणहजारात१७०६
शहरीहजारात८९९
एकुणहजारात२६०६
पुरूषहजारात१३४४
स्त्रीयाहजारात१२६२
स्त्रीयांचे प्रमाणदर हजार पुरूषांमागे९४०
लोकसंख्येची घनतालोकसंख्या दर चौरस कि.मी.२१३
साक्षरता
एकुणटक्केवारी८२.९६
पुरूषटक्केवारी८९.२८
स्त्रीयाटक्केवारी७६.२१
शेती
शेत जमीनहेक्टर (हजारात)१२२१
जंगलाखालील जमीनहेक्टर (हजारात)३१८
एकुण जमीनीशी जंगलाची टक्केवारीटक्केवारी२६.०४
एकुण ओलिताखालील जमीनहेक्टर (हजारात)७०
आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्रेसंख्या६३
शैक्षणिक माहिती
प्राथमिक शाळासंख्या१८८०
आय्.टी.आय्.संख्या१७
आदिवाशी आश्रम शाळासंख्या४१
वाहतुक
रस्तेकि.मी.९२३८
राष्ट्रीय महामार्गकि.मी.७६
राज्य मार्गकि.मी.१६१८
इतर
स्वस्त धान्य दुकानेसंख्या१९४१
खनिजे उत्पादने ---
औद्योगिक उत्पादने तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड हातमाग
औद्योगिक वसाहती अमरावती, अंजनगाव, वरूड, अचलपूर, दर्यापूर, मोरशी
नद्या पूर्णा, तापी, वर्धा, शहानूर, पेढी, विदर्भा, चंद्रभागा, गाडगा
कृषी उत्पादने भात, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, वाटाणा, ऊस, तूरडाळ, मिरची, भूईमूग, तीळ, जवस, सरकी, एरंडी, संत्री, मोसंबी
कृषी बाजारपेठा अमरावती, चांदूर, धामणगाव, दर्यापूर, अचलपूर
हमरस्ते धुळे-कलकत्ता (६)
लोहमार्ग लांबी (किमी) मुंबई-भुसावळ हावरा (ब्रॉडगेज) बडनेरा-अमरावती (ब्रॉडगेज) मुर्तीजापूर- अचलपूर
उद्याने व अभयारण्ये मेळघाट, गुगामल
महत्त्वाचे किल्ले ---
पर्यटनस्थळे
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदयाच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.
सालबर्डी हे पर्यटनस्थळ मोर्शीपासून ८ किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे एक प्रमुख आकर्षण आहे. संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षण आहेत.
विदर्भाची प्राचीन राजधानी म्हणून कुंडीनपूर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. महानुभाव पंथीयांचे हे सर्वात प्रमुख तिर्थस्थळ आहे. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
अचलपुर तालुक्यातील बहीरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या कुशीतील हे ठिकाण महाराष्ट्र्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर आहे. येथे बहीरम (भैरव) या देवाची पुजा केली जाते. येथे दरवर्षी महिनाभर जत्रा चालते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांत प्रसिद्ध आहे.
अमरावती जिल्ह्यातील महत्वाचे पीक कापूस हे आहे. पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. वर्धा नदीवर सिंबोराजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. शहानुर नदीवर शहानुर प्रकल्प आहे. अमरावती शहरात वडाळी तलाव व छत्री तलावातून पाणी पुरवठा होतो.
अमरावती येथे रासायनिक खताचा कारखाना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये रेगूर ही काळी मृदा मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. १९४२ च्या चळवळीत या जिल्ह्याचे महत्वाचे योगदान आहे. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले.
चिखलदरा या ठिकाणाचे उल्लेख महाभारतात आढळतात. याच ठिकाणी भीमाने कीचकाचा वध करून त्याला दरीत फेकून दिले. त्यामुळे त्याला 'किचकदरा' असे नाव पडले, त्यावरूनच पुढे ते चिखलदरा झाले. महाराष्ट्र्रातील एकमेव कॉफी उत्पादक प्रदेश म्हणून चिखलदरा ओळखला जातो. आताशा येथे मध व स्ट्रबेरी चे सुद्धा उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात आहे. मेळघाट हा जंगलव्याप्त परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्या गेला आहे. १९७२ ला घोषित केल्यागेलेल्या देशातील १५ व्याघ्रप्रकल्पांतील हा एक. येथे १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांव्यतिरिक्त हा प्रदेश चित्ते, अस्वल, सांबर, रानडुक्कर, जंगलीकुत्रे , मोर आदींसाठी प्रसिद्ध आहे.
चिखलदया जवळची काही आकर्षण केंद्रे:
  1. मेळघाट व्याघ्रप्रकल्प , कोलखास आणि सीमाडोह हे निसर्गरम्य स्थळे.
  2. गाविलगड किल्ला.
  3. नर्नाळा किल्ला.
  4. पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन
  5. ट्रायबल म्युझीयम
अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लाईडींगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लाईडींग मोजक्याच ठिकाणी होतं. महाराष्ट्र्रातील हे तिसरे ठिकाण आहे.
शिक्षण
जिल्ह्यात तीन अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
  1. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
  2. द्य.ष्.द्व.श्. अभियांत्रिकी महाविद्यालय , अमरावती
  3. सीपना अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती.
वैद्यकीय महाविद्यालये
  1. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.
  2. विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, अमरावती.
  3. द्य.ष्.द्व.श्. दंतशल्यचिकित्सा महाविद्यालय, अमरावती.
  4. श्री वल्लभ तखतमल होमीओपेथी महाविद्यालय, अमरावती.
  5. पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ होमियोपेथीक मेडिकल सायन्सेस, अमरावती.
प्रशासकीय विभाग

जिल्ह्याचे विभाजन १४ तालुके आणि ६ उपविभागांमध्ये करण्यात आले आहे. त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे आहेत.

  1. अमरावती - अमरावती, भातकुली, नांदगाव(खंडेश्वर).
  2. दर्यापुर - दर्यापूर, अंजनगाव.
  3. अचलपूर -अचलपूर, चांदूर बाजार.
  4. मोर्शी - मोर्शी, वरुड.
  5. धारणी - धारणी, चिखलदरा.
  6. चांदूर(रेल्वे) - चांदूर(रेल्वे),धामनगाव तिवसा.
जिल्ह्यातील तालुके
  • चांदुर बाजार,
  • चांदुर रेल्वे ,
  • चिकलदरा,
  • अचलपूर,
  • अंजनगाव सुर्जी,
  • अमरावती तालुका,
  • तिवसा,
  • धामणगांव रेल्वे,
  • धारणी,
  • दर्यापूर,
  • नांदगाव खंडेश्वर,
  • भातकुली,
  • मोर्शी
  • वरुड

Maharshtratil jilhe- akola

 

अकोला :-

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण हे शहर मोर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे मुख्य ठिकाण म्हणूनही अकोला प्रसिध्द आहे. येथील राजराजेश्र्वर मंदिर, सतीमाता मंदिर व जैन मंदिर प्रसिध्द आहेत. येथे संत तुकाराम कर्करोग उपचार रूग्णालय उभे राहिजे आहे. या शहरात सुती कापडाच्या गिरण्या आहेत. येथे दूरदर्शन प्रक्षेपण केंद्र असून विमानासाठी एक धावपट्टीही आहे. हे मुंबई-कोलकता लोहमार्गावरील जक्शन आहे. सुती कापडाच्या व्यापाराचे हे एक केंद्र आहे.

बाळापूर :-

बाळापूर तालुक्याचे हे मुख्य ठिकाण मन व म्हैस या नद्यांच्या संगमावर वसले आहे. बाळापूर देवीच्या मंदिरामुळे शहरास हे नाव पडले आहे. येथील हातमागावर तयार होणार्‍या सतरंज्या प्रसिध्द आहेत. येथील मिर्झाराजे जयसिंगाची छत्री व किल्ला प्रेक्षणीय आहे. येथील किल्ला औरंगजेबचा मुलगा आझममशहा याने बांधला आहे, असे म्हटले जाते.

नरनाळा :-

अकोट तालुक्यात गाविलगडच्या डोंगररांगांत नरनाळा हा प्राचीन किल्ला वसला आहे. दाट वनश्रीने वेढलेला सुमारे २२ चौरस कि. मी. क्षेत्रफळाचा व सत्तावीस दरवाज्यांचा हा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील अभयाण्य प्रसिध्द आहे.

मूर्तीजापुर :-

मूर्तीजापुर तालुक्याचे ठिकाण. हे मुंबर्इ् कोलकता लोहमार्गावरील महत्वाचे जंक्शन आहे. येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.

हिरवखेड :-

हे स्थळ तेल्हारा तालुक्यात असून ते आंब्यासाठी प्रसिध्द आहे. येथे जिनिंग व प्रेसिंग कारखाना आहे.
अकोट :-
अकोट तालुक्याचे मुख्य ठिकाण येथे तयार होणार्‍या सतरंज्या व गोणी प्रसिध्द आहे.

पातूर :-

अकोला जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुक्याचे ठिकाण हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिध्द आहे. येथे जाजमे व रजया रंगविल्या जातात. येथे सिधाजीबुवांची यात्रा भरते.
याशिवाय बार्शी -टाकळी ( तालुक्याचे ठिकाण हेमाडपंती मंदिर ), पारस ( बाळापूर तालुक्यात औष्णिक विद्युतनिर्म्ािती केंद्र),ही जिल्ह्यातील महत्वाची अन्य स्थळे होत.

हवामान :-

जिल्ह्यातील हवामन सामान्यपणे उष्ण आहे. समुद्रकिनार्‍यापासून लांब अंतरावर असल्याने व खंडांतर्गत स्थान लाभल्याने जिल्ह्याचे हवामान अत्यंत विषम आहे. उन्हाळा अतिशय दाहक असेन हिवाळा कडाक्याच्या थंडीचा असतो. में महिन्यात तापमान अनेकदा ५० से ची मर्यादा गाठते, तर हिवाळयात ते पुष्कळदा ८ से पर्यत खाली येते नैऋत्य मोसमी वार्‍यांपासून मिळणार्‍या पावसाचा काही काळ वगळता वर्षभर हवा कोरडी असते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वार्‍यांपासून सरासरी ७५ ते १०० से. मी. पाऊस पडतो. जिल्ह्यातील पावसाचे वितरण असमान आहे. सर्वसाधारणत: पावसाचे प्रमाण जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात कमी आहे. बाळापूर,अकोला व मुर्तिजापूर तालुक्यांत तुलनात्मकदृष्टया पाऊस कमी पडतो.

नद्या :-

पूर्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी होय. हिचा उगम मध्य प्रदेश राज्यात बेतूल जिल्ह्यात सातपुडयाच्या पर्वतरांगांमध्ये होतो. अमरावती जिल्ह्यातून ती अकोला जिल्ह्यामध्ये मुर्तिजापूर तालुक्यात प्रवेशते जिल्हयातील तिचा प्रवास काहीसा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा होतो. तिचा हा प्रवास मेर्तिजापूरम, अकोला व बाळापूर तालुक्यांच्या उत्तरेकडील सीमावर्ती भागातून, तर अकोट व तेल्हारा या तालुक्यांच्या दक्षिणेकडील सीमावती भागातून होतो. शहानूर, पठार व आस आदी नद्या तिला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येऊन मिळतात. कष्टेपूर्णा, मोर्णा, मन व उमा या तिच्या दक्षिण काठावरील उपनद्या होत. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अज्ंिाठयाच्या डोंगररांगांत उगम पावून मूर्तीजापुर तालुक्यात लाईतजवळ पूर्णेस मिळणारी काटेपूर्णा ही पूर्णेची मोठी उपनदी होय. काटेपूर्णा नदीचा जिल्ह्यातील प्रवास दक्षिणेकडून उत्तरेकडे असा होतो. मूर्तीजापुर तालुक्यातच सांगवी या गावाजवळ पूर्णा व उमा नद्यांचा आहे. निर्गुणा ही मन नदीची उपनदी जिल्ह्यातून वाहते. म्हैस नदी बुलढाणा जिल्ह्यातून या जिल्ह्यात वाहत येते. मन व म्हैस या नद्यांचा संगम बाळापूर जवळ झाला आहे.

maharshtratil jilhe - Ahamadnagar

 
बाबएककसंख्या
अहमदनगर जिल्हा
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. आजच्या परीस्थीतीत अहमदनगर जिल्हा हा सर्वात पुढारलेला आहे. शिर्डी येथील साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगांव तालुक्यात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने आहेत. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिली सहकारी साखर कारखाना स्थापन झाला होता. 'राळेगणसिध्दी' वारे जिल्ह्याने जलव्यवस्थानाचा एक आदर्श निर्माण केला तर 'हिवरे बाजार' हे आदर्श खेडे म्हणून नावारुपास आले. जिल्ह्याचे नाव अहमद शाह निझाम शाह या अहमदनगर शहराच्या संस्थापकावरुन पडले आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक जिल्हा व औरंगाबाद जिल्हा, पूर्वेस बीड व उस्मानाबाद जिल्हा, दक्षिणेस पुणे जिल्हा व सोलापूर जिल्हा तर पश्चिमेस पुणे जिल्हा व ठाणे जिल्हा आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री घाट असून घाटातील कळसुबाई हे सर्वोच्च टोक याच जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या भीमा प्रवरा, सीना व गोदावरी ह्या आहेत. जिल्ह्यातील हवामान विशेषत: उष्ण व कोरडे आहे तर वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०१.८ मी.मी इतके आहे.जिल्ह्यात अनेक छोटे व मोठे उद्योग आहेत परंतू जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने देखिल आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आहे.
भौगोलिक माहिती
स्थान
उत्तर अक्षांशअंश१८.० ते १९.९
पुर्व रेखांशअंश७३.९ ते ७५.५
सरासरी पाऊसमिलीमीटर५६६
क्षेत्रफळचौ. कि.मी.१७४१२
प्रशासकीय माहिती
ग्रामिण
तालुकेसंख्या१४
पंचायत समित्यासंख्या१४
ग्रामपंचायतीसंख्या१३०९
खेडेसंख्या१५८१
शहरी
महानगर पालिकासंख्या-
नगरपालिकासंख्या
लष्करी छावणीसंख्या
शहरेसंख्या१८
लोकसंख्या
ग्रामिणहजारात३४८४
शहरीहजारात८०४
एकुणहजारात४०८८
पुरूषहजारात२१०६
स्त्रीयाहजारात१९८२
स्त्रीयांचे प्रमाणदर हजार पुरूषांमागे९४१
लोकसंख्येची घनतालोकसंख्या दर चौरस कि.मी.२३९
साक्षरता
एकुणटक्केवारी७५.८२
पुरूषटक्केवारी८६.२१
स्त्रीयाटक्केवारी६४.८८
शेती
शेत जमीनहेक्टर (हजारात)१७४१
जंगलाखालील जमीनहेक्टर (हजारात)१४५
एकुण जमीनीशी जंगलाची टक्केवारीटक्केवारी८.३३
एकुण ओलिताखालील जमीनहेक्टर (हजारात)३८३
आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्रेसंख्या८८
शैक्षणिक माहिती
प्राथमिक शाळासंख्या३०९२
आय्.टी.आय्.संख्या३२
आदिवाशी आश्रम शाळासंख्या२४
वाहतुक
रस्ते लांबीकि.मी.१४५३८
राष्ट्रीय महामार्गकि.मी.६०
राज्य मार्गकि.मी.१७८५
इतर
स्वस्त धान्य दुकानेसंख्या१८२०
खनिजे उत्पादने ---
औद्योगिक उत्पादने तंबाखू उत्पादने, दुचाकी वाहने, यंत्राचे सुटे भाग, साखर, मद्य, मद्यार्क, सुती, रेशीम, औषधे
औद्योगिक वसाहती अहमदनगर, श्रीरामपूर, जामखेड, राहूरी .
नद्या सीना,मुळा, प्रवरा, गोदावरी,घोड, भीमा,कुकडी, हंगा.
कृषी उत्पादने भात, गहू, ज्वारी, नाचणी, मका, वाटाणा,तुर,ऊस, मिरची,कापूस, भुईमूग,तीळ, जवस, तंबाखू, मोसंबी, द्राक्षे, हरभरा, मूग.
कृषी बाजारपेठा कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, अहमदनगर, पारनेर, राहूरी.
हमरस्ते पुणे, नाशिक (५०)
लोहमार्ग लांबी (किमी) दौंड-मनमाड (१९७)
उद्याने व अभयारण्ये माळढोक, देऊळगांव, रेहेकुरी, हरिश्चंद्र गड-कळसुबाई.
महत्त्वाचे किल्ले हरिश्चंद्र गड, रतनगड, भुईकोट
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे साईबाबा मंदिर,शिर्डी, चिंकारा व माळढोक अभयारण्य, रेणुकामाता मंदिर (केडगांव), अहमदनगर किल्ला, सिध्दटेक, शनीशिंगणापूर, हरिश्चंद्रगड, चांदबीबी महल
जिल्ह्यातील तालुके
  • नगर,
  • पारनेर,
  • पाथर्डी,
  • नेवासे,
  • श्रीरामपूर,
  • शेवगांव,
  • राहुरी,
  • राहाता,
  • संगमनेर,
  • कोपरगाव,
  • अकोले,
  • श्रीगोंदा,
  • जामखेड
  • कर्जत.

Jalvidyut kendra

  

जलविद्युत केंद्रजिल्हा
भाटघर जलविद्युत केंद्रपुणे जिल्हा
भिवपुरी जलविद्युत केंद्ररायगड जिल्हा
खोपोली जलविद्युत केंद्ररायगड जिल्हा
झारवाड जलविद्युत केंद्रनाशिक जिल्हा
कोयना जलविद्युत केंद्रसातारा जिल्हा
येलदारी जलविद्युत केंद्रपरभणी जिल्हा
राधानगरी जलविद्युत केंद्रकोल्हापुर जिल्हा
पेंच जलविद्युत केंद्रनागपुर जिल्हा
विल्लारी जलविद्युत केंद्रकोल्हापुर जिल्हा

Media


 
समाजामध्ये संर्पक साधनांना अनन्यसाधारण महत्व आहे. धंदा, व्यापार विकास, प्रशासकीय सेवांचा विस्तार या सर्वांसाठी कार्यक्षम संर्पकयंत्रणा आवश्यक आहे. गेल्या सुमारे पन्नास वर्षामध्ये संर्पक यंत्रणेमध्ये नवनवीन माध्यमे उपलब्ध झाली. त्यामुळे आर्थिक व्यवहार, प्रशासकीय सेवा, शिक्षण, करमणुक या क्षेत्रामंध्ये क्रांती झाली, तर्‍हेतर्‍हेची माहिती द्रुतगतीने मिळविणे, ती माहिती साठवून तिचे वर्गीकरण करणे, त्या माहितीवर प्रक्रिया करणे, ती योग्य ठिकाणी ताबडतोब पोहोचवणे आता शक्य होते. त्यामुळे लोक जवळ येण्यास मदत झाली आहे. देशाचे संरक्षण, कायदा, सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योगधंदे अशा सर्व बाबतीमधील प्रगतीचे टप्पे केवळ संर्पक माध्यमांच्या विकासामुळे गाठले गेले आहेत.
संर्पक व्यवस्थेत व्यक्तींशी संर्पक साधणार्‍या कोणत्याही माध्यमाचा समावेश होऊ शकतो. तसेच माहिती-ज्ञान- धोरण-सिध्दांत- तज्ञ्ल्त्;व यांच्या प्रचारांचा अंतर्भाव होऊ शकतो. सरकारी पातळीवर वापरली जाणारी आणि जनसामान्यांमध्ये रूजून गेलेली अशी मुख्य प्रसार साधने: चित्रपट, आकाशवाणी, दुरदर्शन व वृत्तपत्रे. प्रमुख संर्पक साधने दूरवाणी, टपाल, तार, टेलेक्स. वरीलपैकी वृत्तपत्रे आणि मुदि्रत वाङ्मय ही खाजगी मालकीची असून इतर बहुतेक प्रचारमाध्यमे केंद्र सरकारमार्फ़त कार्यांन्वित केली जातात. करमणुकीसाठी चित्रपटांचा प्रसार खाजगी क्षेत्रामार्फ़त होतो. परंतु महाराष्ट्र्र शासनमर्ाफत वृज्ञ्ल्त्;ा आणि विचारांच्या प्रसारासाठी चित्रपट माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग केला जातो. कीर्तनाचा उपयोग कुटुंबकल्याण, आरोग्य, शिक्षणाचे महत्व यांच्या प्रसारासाठी यशस्वीपणे साधला गेला आहे. अशा साधनांमधून माहितीचा प्रसार, लोकशिक्षण व करमणूक अशी तीनाही उद्दीष्टे साध्य होतात.

टपालसेवा :

महाराष्ट्र्रामध्ये उद्योगधंदे, व्यापार, साक्षरता यांचा प्रसार इतर राज्यांच्या तुलनेने पुष्कळ समाधानकारक असल्यामुळे वरील सर्व माध्यमांचा लाभ राज्यास बर्‍यापैकी झालेला आहे. देशामध्ये टपाल कचेर्‍यांची संख्या आज १,५३,४२३ आहे. त्यातील ८९ टक्के पोस्ट कचेर्‍या ग्रामिण भागात आहेत. महाराष्ट्र्रात आज १२,४२३ टपाल कचेर्‍या आहेत. यांपैकी सुमारे ८९ टक्के ग्रामिण भागात आहेत. एक टपाल कचेरी राज्यात सरासरी सुमारे ६,००० व्यक्तींना टपालसेवा पुरवते. संपूर्ण देशात हे प्रमाण ५,८२७ आहे. राज्यात सरासरी २५.७७ चौ.कि.मी. मागे एक टपाल कचेरी आहे तर भारतात हे प्रमाण सुमारे २२ चौ.कि.मी. मागे टपाल कचेरी असे आहे. राज्यातील सर्व खेडयापर्यंत टपालसेवा पोचली आहे. टपाल साहित्याची विक्री, बचत बॅंक, द्रुत टपाल-सेवा, फॅक्स सेवा रात्रीची टपालसेवा, आयुर्विमा, बचत प्रमाणपत्रांचे व्यवहार, युनिट ट्रस्टचे व्यवहार, आयकर, पासर्पोट, आवेदनपत्रे, वाहन कर भरणे आशा सेवा टपाल कचेर्‍यांमार्फ़त मिळतात. ८ ठिकाणी रात्रीची टपालसेवा आहे. टपालसेवा हाताळण्याचे मुंबई हे देशात मोठे केंद्र आहे. पोस्टाच्या तिकीटांचा संच करणार्‍या छंदास उत्तेजन देणारी सेवाही राज्यात ऊपलब्ध आहे. अशी ३ केंद्रे राज्यात आहेत. जलद टपालसेवा (स्पीड पोस्ट) देशात ७३ ठिकाणी सुरू असून राज्यात पुणे, मुंबई, ठाणे, नागपुर, औरंगाबाद, कोल्हापुर अशा अनेक ठिकाणी ही सेवा आहे. थोडा जादा आकार घेतला जाऊन देशातील निवडक शहरांमध्ये २४ तासात रजिस्ट्रड पत्रे पोचविण्याची ही योजना आहे. टपालाची वेगाने हाताळणी होण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा मुंबईत बसविण्यात येत आहे. तेथे कॉम्प्युटर व मायक्रोप्रोसेसर बसवला जात आहे. जलद टपाल सेवेच्या सर्व शहरांमध्ये यावर्षीपासून जलद मनिर्ऑडर सेवा देणे सुरू झाले. टपाल खात्यात उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍यांना टपालसेवा पुरस्कार व मेघदूत पुरस्कार दिलेे जातात.

तारसेवा :

भारतातील सर्वात मोठी तारकचेरी मुंबईत असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सेवा या केंद्रामार्फ़त पुरवल्या जातात. आज भारतात ६९,९८६ तारकचेर्‍या आहेत. पैकी महाराष्ट्र्रात २,४५२ आहेत. आठव्या योजनाकाळात राज्यात २०० नवी तार ऑफिस सुरू करण्याचा प्रस्ताव असून ६५० तारघरांचे नव्या इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

टेलेक्स :

टेलेक्सची सोय देशात १९६३ मध्ये सुरू झाली. १९६९ मध्ये देवनगरीमध्ये टेलेक्स संर्पक सुरू झाला. महाराष्ट्र्रामध्ये मुंबई, पुणे, नागपुर, नाशिक, कोल्हापुर, अमरावती, औरंगाबाद, अमळनेर येथे टेलेक्सची व्यवस्था आहे. मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक टेलेक्स एक्स्चेंजची सोय यावर्षी झाली. फॅक्स, व्हिडीओ टेक्स अशा सेवा गेल्या वर्षी सुरू झाल्या.

दूरध्वनी :

दूरवाणी (टेलिफोन) च्या बाबतीत महाराष्ट्र्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. १९९८ च्या सुरूवातीस भारतात दूरवाणीची सुमारे ९० लाख कनेक्शन दिली होती. त्यांपैकी ३९ लाख महाराष्ट्र्रात होती. (त्यात मुंबईचा वाटा फार मोठा आहे). स्वयंचलित दूरवाणी केंद्र, आंतरराष्ट्रीय दूरवाणी संर्पक, थेट अंतर्गत व आंतरराष्ट्रीय ट्रंककॉल सेवा, (जगातील अनेक शहरांशी आता डायल फिरवून थेट बोलता येते). जहाजांवरून जमिनीवर मिळणारा दूरवाणी संर्पक
किनार्‍यापासून ७५० कि.मी. पर्यंतच्या जहाजांना किनार्‍याशी दूरवाणी सदृश संर्पक साधता येतो मागणीनुसार ट्रंक सेवा अशा सर्व सेवा महाराष्ट्र्रातही उपलब्ध असून मुंबई हे त्याचे मुख्य केंद्र आहे. मुंबई शहराचा राज्यातील ११९ शहरांशी व देशातील १३८० शहरांशी दूरवाणीसंर्पक साधण्यात आला आहे. जगातील २१० देशातील अनेक शहरांशी मुंबईचा थेट संर्पक आहे. मुंबई व नवी दिल्ली या महानगरांसाठी एप्रिल १९८६ मध्ये महानगर टेलिफोन निगमाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अधिक वित्त सहाय्य हया प्रकल्पासाठी गोळा करता आले. एकटया मुंबई शहरात एकोणीस लाखाहून अधिक दूरध्वनी असून १९९५ नंतर मागेल त्याला तात्काळ दूरध्वनी देणे सुरू झाले आहे. राज्यात उत्पन्नात होणारी वाढ, बॅंक, विमा, धंदा, व्यापार, प्रशासन अशा सेवांचा विस्तार यांमुळे दूरवाणीची मागणी पुढे कित्येक पटींनी वाढेल, अधिक कनेक्शन्स् देऊन दूरवाणीची वाढ होईल. टपाल व तारखात्यामार्फ़त चालवले जाणारे दूरसंर्पक यंत्रसामग्रीचे चार कारखाने सध्या देशात असून त्यातील एक मुंबईला आहे.

आंतरराष्ट्रीय संर्पक :

आंतरराष्ट्रीय संर्पकसेवा हा देशाच्या आणि राज्याच्या संर्पक यंत्रणेतील एक महत्वाचा भाग आहे. या सेवेचेही प्रमुख केंद्र मुंबई येथे आहे. कामासाठी विदेश संचार निगम लि. ची स्थापना एप्रिल १९८६ मध्ये करण्यात आली. बाहेरील देशांशी तार, दूरवाणी, टेलेक्स, रेडिओ, फोटो, आंतरराष्ट्रीय दूरदर्शन, रेडिओ कार्यक्रमांची देवाण-घेवाण या सेवा उपग्रहांमार्फ़त दिल्या जातात. त्यासाठी देशात दोन ठिकाणी-डेहराडून (उ.प्र. येथे, स्थापना १९७६) व महाराष्ट्र्रात आर्वी येथील (ता. जुन्नर, जि, पुणे, स्थापना १९७१) येथे केंद्रे उभारण्यात आली आहेत. आर्वी येथील कृत्रिम उपग्रह केंद्र जगातील सर्वात मोठे असून त्यामुळे देशांतर्गत परदेशी बोटी, विमाने यामधील संदेशवहन सुलभ होते. हिंदी महासागरावर भूस्थिर केल्या गेलेल्या इंटरसॅट या उपग्रकामार्फ़त १५० देशांशी सध्या संर्पक साधला जातो. विविध तर्‍हेचा आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयामार्फ़त देशात २१ सूत्रसंचालन केंद्र उभारली आहेत. राज्यात मुंबई व नागपुर येथे ती केंद्र आहेत. बिनतारी संदेशाची देवाण घेवाण करणार्‍या परवानाधारक अधिकृत केंद्रावर निरीक्षण करण्यासाठी देशात दहा ठिकाणी उपकेंद्रे उभी करण्यात आली आहेत. राज्यात मुंबई व नागपुर येथे ही केंद्रे आहेत. जानेवारी २००० पर्यंत राज्यात सुमारे १,३२,५०५ इंटरनेट कनेक्शन्स दिली गेली होती.

आकाशवाणी :

करमणुकीचे कार्यक्रम, वृत्तप्रसार, आरोग्य-कुटुंब-कल्याण आदींचा प्रसार शेतकर्‍यांना मार्गदर्शन, हवामान, बाजारभाव यांची दैनंदिनी माहिती यांच्याप्रसारासाठी आकाशवाणी हे माध्यम प्रभावी आहे. ही सेवा उपलब्ध करून देणे केंद्र सरकारच्या माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाच्या अखत्यारीत येत असले तरी घटक राज्यांमधील केंद्रांना कार्यक्रमाच्या निवडीस काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रादेशिक भाषामधील कार्यक्रमांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. स्वातंत्र्यापूर्वी १९२७ मध्ये प्रथम मुंबई येथे रेडिओ केंद्र सुरू झाले. १९४७ मध्ये भारतात फक्त ६ रेडिओ केंद्रे होती.
आज भारतात १९७ रेडिओ केद्रें आहेत. महाराष्ट्र्रात त्यापैकी १३ केंद्रे आहेत. औरंगाबाद, मुंबई, जळगाव, नागपुर, परभणी, पुणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापुर, सातारा, नाशिक, अहमदनगर व सोलापुर. राज्यात नांदेड, बीड, मालवण, धुळे, चंद्रपुर, उस्मानाबाद, अकोला, यवतमाळ येथे स्वतंत्र आकाशवाणी केंद्रे होत आहेत. मुंबई केद्रांची सेवा लघुलहरीवरूनाही प्रक्षेपित होते. आकाशवाणीवरील प्रक्षेपणाचा सुमारे ३८ टक्के वेळ संगीतासाठी असतो. तसेच उपशास्त्रीय, सुगम-सिने लोकसंगीत, वाद्यवृंद जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास आकाशवाणीचे माध्यम कारणीभूत ठरले आहे. याशिवाय नभोनाटये, वृत्तनिवेदन, चालू घडामोडींवरील चर्चा, संथगतीतील बातम्या, संसद समालोचन, विज्ञानचर्चा, पुस्तक परिक्षणे, कामगार, लहान मुले, विद्यार्थी, युवक, महिला, सैनिक, ग्रामिण जनता व शेतकरी वर्ग यासाठी विशेष कार्यक्रम आकाशवाणीवर असतात. देशातील लोकांसाठी २३ भाषा व ३५ आदिवासी उपभाषा यांमधून वृत्तनिवेदन केले जाते. विविध भारतीचे करमणूक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होऊन राज्यात पुणे व नागपुर येथून पुन:क्षेपित होतात. १ नोव्हेंबर १९६७ रोजी मुंबई केंद्रावर व्यापार विभाग प्रथमच सुरू झाला. आज त्यावर जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम सादर केले जातात.

दूरदर्शन :

मुंबईमध्ये २ ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन केंद्र सुरू झाले. सध्या राज्यामध्ये मुंबई, नागपुर येथून कार्यक्रमाचे प्रसारण व पुणे, सोलापुर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापुर, सातारा, अमरावती येथून कार्यक्रमाचे पुन:क्षेपण होते. मुंबई केद्रावर दुसरी वाहिनी मे १९८५ मध्ये सुरू झाली. पुणे येथून कार्यक्रमाचे प्रक्षेपण सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या राज्यात ५ उच्च शक्ती दूरदर्शन प्रक्षेपक केंद्रे व ४० लघुशक्ती प्रक्षेपक केंद्रे आहेत.
राज्यातील शहरी व ग्रामिण अशा दोन्ही लोकसंख्येला दूरदर्शनचा फायदा मिळतो. दूरदर्शन हे जाहिरातीचे कार्यक्रम, युवादर्शन, कामगार विश्व, संगीत, चर्चा, प्रात्यक्षिके, वृज्ञ्ल्त्;ा, सिनेमा, नाटक, मुलाखती, खेळाचे सामने अशा तर्‍हेने दृश्य व श्राव्य माध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोहोचते. नभोवाणी व दूरदर्शन यांचा समाजावर परिणाम निश्चितपणे होत असतो. समाजशिक्षण, प्रौढांसाठी कार्यक्रम, नागरिकांची कर्तव्ये, सामाजिक सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य, संगणक शिक्षण, प्रदूषण, योगशिक्षण, विज्ञानकला व छंद, कुटुंबकल्याण, वृत्तसेवा, बधिरांसाठी वृत्तसेवा, गुंतवणुकीसाठी सल्ला अशा विविध विषयांतून या माध्यमाने लोकसंर्पक साधला आहे. शालेय दूरवाणी व विद्यापीठ अनुदान आयोगासाठी केलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचाही राज्यातील जनतेस लाभ मिळतो. दिल्लीमध्ये १९५९ साली कार्यक्रमाव्दारे लोकशिक्षणाचे काम दूरदर्शनने प्रभावीपणे केल्याची नोंद अनेक जाणकारांनी दिली आहे. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, हॉकीचे सामने, क्रिडास्पर्धा यांचा आस्वाद, दृश्य व श्रवण माध्यमातून घेणे ही आधुनिक युगातील विशेष उपलब्धी आहे. शिक्षणप्रसार, करमणुकीची गरज व वाढते राहणीमान यामुळे दुरदर्शन या माध्यमाच्या अत्यंत जलद प्रसार होईल व पुढील काही वर्षे नभोवाणी व दुरदर्शनच्या वापरातील महाराष्ट्र्राची आघाडी कायम राहील.
१९४७ पासून राज्यात सामूहिक दूरचित्रवाणी योजना वर्गणी तत्वावर अंमलात आली आहे. याव्दारे सार्वजनिक संस्था, शाळा, रूग्णालये, ग्रामपंचायती, ग्रंथालये इत्यादी ठिकाणी दूरदर्शन संच शासनातर्फे बसवले जातात. त्यासाठी बसवण्याची व परिरक्षणाची फी आकारली जाते. १९९२ पर्यंत असे १०१९० संच राज्यातील विविध भागात बसवले होते. त्यापैकी १७०० आदिवासी भागात होते.

दैनिके व नियतकालिके :

नियतकालिकांच्या प्रसाराच्या बाबतीत देशात उत्तरप्रदेशाचा क्रम पहिला दिल्लीचा दुसरा व महाराष्ट्र्राचा क्रम तिसरा लागतो. १९९९ मध्ये देशात ४३,८२८ नियतकालिके (दैनिके, साप्ताहिके, व्दिसाप्ताहिके धरून) प्रसिध्द होत होती; पैकी महाराष्ट्र्रात ३६१४ होती. त्यापैकी ३२५ दैनिके होती. १९९९ मधील देशातील दैनिक व नियतकालिकांपैकी २०४६ (४.७%) मराठीत होती. महाराष्ट्र्रात मराठीबरोबर बहुतेक सर्व राष्ट्रीय भाषामध्ये, उपभाषामध्ये व अनेक विदेशी भाषामध्ये नियतकालिके प्रसिध्द होत असतात. वृत्तपत्रांचा प्रसार हा साक्षरतेवर अवलंबून असतो. मराठीतील वृत्तपत्राचा रोज एकुण खप १७ लाख असला तरी हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रांचा खप मराठीपेक्षा जास्त आहे.
राज्यातील प्रमुख मराठी दैनिके: महाराष्ट्र्र टाइम्स-लोकसज्ञ्ल्त्;ाा-नवशक्ती (मुंबई), सकाळ-केसरी-लोकसज्ञ्ल्त्;ाा लोकमत- (पुणे) लोकमत- (नागपुर), ऐक्य (सातारा), प्रजावाणी (नांदेड), गावकरी (नाशिक), पुढारी (कोल्हापुर), संचार (कोल्हापुर), संचार (सोलापुर), अंजिठा- मराठवाडा, लोकमत (औरंगाबाद), सागर (चिपळूण) इ.
प्रमुख इंग्रजी दैनिक : टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जर्नल, इंडिपेन्डन्ट (मुंबई), नागपुर टाईम्स (नागपुर), महाराष्ट्र्र हेरॉल्ड (पुणे), लोकमत टाइम्स (औरंगाबाद). मुंबईतील गुजराती भाषेतील बॉंबे समाचार हे देशातील सर्वात जूने चालू दैनिक आहे. (स्थापना १८२२)
नियतकालिकांच्या वाढीस आणि प्रसारात वृत्तपत्र कागदाच्या टंचाईमुळे आणि छपाईच्या साधनांच्या महागाईमुळे अडथळे येतात. त्यांची झळ विशेषत: प्रादेशिक भाषामधील वृत्तपत्रांना पोहोचते. सरकारी आणि खाजगी कागद गिरण्यांमार्फत वृत्तपत्र कागदाच्या उत्पादनाचे मोठे प्रयत्न आजपर्यंत झाले. तरी देखील १९९८ मध्ये एकुण मागणीपैकी सुमारे ७०- पुरवठा आयात करून भागवावा लागतो. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या वृत्तसंस्था इंग्रजीमध्ये वृत्तवितरण करतात. समाचार भारती, हिंदुस्थान समाचार या मराठी आणि इतर प्रादेशिक भाषामध्ये वृत्तवितरण करतात. सरकारने 'हमारा देश' या नावाने मोठया पाक्षिया भिज्ञ्ल्त्;िापत्रकाचे प्रसारण १९७० मध्ये सुरू केले. ते मराठीसह १२ भाषामध्ये प्रसारित होते व ग्रंथालय, टपाल कचेर्‍या, बॅंका, रेल्वे स्थानके व सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावले जाते. त्यामध्ये प्रमुख घटना, विकास कार्यक्रमात गाठलेले टप्पे, क्रीडा, शेती, उद्योगधंदे अशा क्षेत्रांमध्ये मिळविलेले विशेष नैपुण्य सोप्या भाषेत आणि मोठया अक्षरात सचित्र प्रस्तुत केले जाते. सामान्य नागरिक, प्रौढ साक्षर विद्यार्थी अशा लोकांपर्यंत संर्पकसाधण्याचा हा प्रभावी मार्ग बनला आहे.
वृत्तपत्रांच्या माध्यमातून सरकारी धोरणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केंद्रे सरकारने वृत्तपत्र विभागाची स्थापना केली. ती सेवा राज्यातही उपलब्ध आहे. सरकारी क्षेत्रातील उपक्रम, राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या प्रचारयंत्रणेत सुसूत्रता राखवण्याचे काम या विभागातर्फे केले जाते. तसेच वृत्तपत्रात येणार्‍या बातम्यांचा व मतांचा परामर्श सरकारपर्यंत पोहोचविण्याची कामगिरीही या विभागावर आहे. बातम्या छायाचित्रे, निवेदन, वृत्तसारांश ही सर्व साधने मराठी- इंग्रजी अशा भाषामंध्ये राज्यात सर्वत्र उपलब्ध होतात.

चित्रपट :

देशातील चित्रपट व्यवसाय मुंबई, कलकज्ञ्ल्त्;ाा व मद्रास येथे एकवटला आहे. १९९८ साली ६९३ पूर्ण वेळ करमणूक चित्रपट प्रकाशित झाले. त्यापैकी ६४% मद्रास येथून होते तर २८% मुंबईत होते. यावर्षी हिंदीत १५७ तर मराठीत २१ चित्रपट प्रकाशित झाले. मुंबई हे मराठी व हिंदी चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. एकेकाळी देशातील सुमारे ८०% चित्रपटांची निर्मिती महाराष्ट्र्रात होत असे. आता ते प्रमाण इतके कमी आले आहे. मराठी चित्रपट निर्मिती पुणे, कोल्हापुर येथेही होत आहे. राज्यात या व्यवसायात कोटयावधी रूपयांची उलाढाल होते. कार्टून, वार्तापट, अनुबोधपट यांयासहाय्याने या माध्यमाचा उपयोग करून घेतात. सर्व भारतीय भाषामध्ये प्रकाशित होणारे हे चित्रपट मुख्य चित्रपटाआधी दाखवणे कायद्याने बंधनकारक आहे. व्हिडिओव्दारा होणार्‍या चित्रपट चोरीला आळा घालण्यासाठी व ग्रामिण भागातील सर्वसामान्य माणसाला चित्रपट पहाणे शक्य व्हावे म्हणून किमान ३००० वस्तीच्या गावांमध्ये १६ मि.मी. चित्रपट गृहे सुरू करण्याची शासनाची योजना असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्र्यांनी ऑगस्ट १९८६ मध्ये जाहिर केले. राज्यातील करमणूक करात ५०% ने कपात करण्याचा निर्णय शासनाने १९९४ मध्ये जाहिर केला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून करमणूक कर परत करण्याची योजना चालू आहे. मराठी चित्रपट वर्षातून चार आठवडे दाखवणे राज्यातील प्रत्येक चित्रपटगृहास बंधनकारक आहे.
राज्यात पुणे नॅशनल फिल्म अकाईव्हची कचेरी आहे. तेथे अनेक भाषामधील चित्रपट, वार्तापट, चित्रपटविषयक पुस्तके, नियतकालिके, पत्रके, गीतपुस्तके, ध्वनिमुद्रीका, ध्वनिफीती, सूक्ष्मचित्रपट, पुस्तकाचित्रे, छायाचित्रे, जाहिराती यांचा संग्रह जतन वर्ग घेतले जातात. प्रदर्शन भरवली जातात. तसेच चित्रपट सप्ताह साजरे केले जातात.
पुणे येथे फिल्म व टेलिव्हिजन इन्स्ट्टियूट आहे. तेथे अभिनय संकलन, छायाछित्रण, ध्वनिमुद्रण यांचे पदविका शिक्षण दिले जाते.

Maharashtratil ghat

  
घाटाचे नावेकि.मी.मार्ग
राम घाट७ कि. मी.कोल्हापुर - सावंतवाडी
अंबोली घाट१२ कि. मी.कोल्हापुर - सावंतवाडी
फोंडा घाट९ कि. मी.संगमेश्वर - कोल्हापुर
हनुमंते घाट१० कि. मी.कोल्हापुर - कुडाळ
करूळ घाट८ कि. मी.कोल्हापुर - विजयदुर्ग
बावडा घाट-कोल्हापुर - खारेपाटण
आंबा घाट११ कि. मी.कोल्हापुर - रत्नागिरी
उत्तर तिवरा घाट-सातारा - रत्नागिरी
कुंभार्ली घाट-सातारा - रत्नागिरी
हातलोट घाट-सातारा - रत्नागिरी
पार घाट१० कि. मी.सातारा - रत्नागिरी
केंळघरचा घाट-सातारा - रत्नागिरी
पसरणीचा घाट५ कि. मी.सातारा - वाई
फिटस् जिराल्डाचा घाट५ कि. मी.महाबळेश्वर - अलिबाग
पांचगणी घाट४ कि. मी.पोलादपुर - वाई
बोरघाट१५ कि. मी.पुणे - कुलाबा
खंडाळा घाट१० कि. मी.पुणे - पनवेल
कुसुर घाट५ कि. मी.पुणे - पनवेल
वरंधा घाट५ कि. मी.पुणे - महाड
रूपत्या घाट७ कि. मी.पुणे - महाड
भीमाशंकर घाट६ कि. मी.पुणे - महाड
कसारा घाट८ कि. मी.नाशिक - मुंबई
नाणे घाट१२ कि. मी.अहमदनगर - मुंबई
थळ घाट७ कि. मी.नाशिक - मुंबई
माळशेज घाट९ कि. मी.नाशिक - मुंबई
सारसा घाट५ कि. मी.सिरोंचा - चंद्रपुर

sagar sampatti

 
आपल्या महाराष्ट्र्र राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. समुद्रापासून आपल्याला अनेक उपयुक्त वस्तू मिळतात. मासे, मीठ, खनिज तेल व नैसर्गिक वायू, रेती, शंख-शिपले ही सर्व सागरसंपत्ती  म्हणून ओळखली जाते.
महाराष्ट्र्राला बराच लांब असा सागरकिनारा लाभला आहे. किनार्‍याची लांबी सुमारे ७०० किमी. आहे. या किनार्‍याचा उपयोग बंदरे, मासेमारी करणे यांसाठी होतो.

मासेमारी :

महाराष्ट्र्र राज्याच्या किनार्‍याजवळ मासेमारी व्यवसाय चालतो. सहकारी संस्थांमार्फत मासेमारीस उत्तेजन दिले जाते. यांत्रिक होडयांच्या (ट्रॉलर) मदतीने खोल समुद्रात सामेसारी केली जाते. मासे नाशवंत असल्याने विक्रीसाठी लगेच पाठवावे लागतात. त्यासाठी मासे हवाबंद डब्यात साठवतात किंवा शीतगृहात गोठवून ठेवतात. शीतगृहात मासे साठवण्याची सोय किनार्‍यालगत अनेक ठिकाणी आहे. खराब माशांचे खत करतात.

नैसर्गिक वायू व खनिज तेल :

सागरतळाखाली आढळणारा नैसर्गिक वायू व खनिज तेल ही महत्वाची संपत्ती  आहे. मुंबईजवळील समुद्रात 'मुंबई हाय' व 'वसई हाय' ही तेलक्षेत्रे आहेत. येथील वायू उरण बंदराजवळ साठवला जातो. मुंबई हायमधून तेल काढण्यासाठी समुद्रात उभारण्यात आलेल्या यंत्राला 'सागर सम्राट' असे नाव दिले आहे.

मीठ :

सागरापासून आपणा सर्वाना मिळणारी संपज्ञत्ती  म्हणजे मीठ होय. किनारपट्टीच्या सखल भागात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत येते. आत आलेले पाणी अडवून ठेवतात. सूर्याच्या उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व मीठ तळाशी साठते. ते मीठ खोर्‍याने ओढून ढीग तयार करतात. नंतर विक्रीसाठी पाठवतात. जेथे मीठ तयार करतात त्या जागेस मिठागर म्हणतात.
ठाणे जिल्हयात वसई, भाईंदर, डहाणू, वाणगाव या भागांत अनेक मिठागरे आहेत.

इतर सागरसंपत्ती :-

सागर किनार्‍यावर विशिष्ट प्रकारची रेती सापडते. तिचा उपयोग घरबांधणीस व कारखान्यात करतात. किनारपट्टीवर शंख - शिंपले  सापडतात. हे शंख -शिंपले  हस्तकलेच्या विविध वस्तू बनवण्यासाठी वापरतात.

Tharmal power in maharashtra

 
औष्णिक विद्युत केंद्रजिल्हा
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रनागपुर जिल्हा
कोराडी औष्णिक विद्युत केंद्रनागपुर जिल्हा
परळी-वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रबीड जिल्हा
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रजळगांव जिल्हा
एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रनाशिक जिल्हा
चोला औष्णिक विद्युत केंद्रकल्याणजवळ,ठाणे जिल्हा
पारस औष्णिक विद्युत केंद्रअकोला जिल्हा
तुर्भे औष्णिक विद्युत केंद्रट्रॉम्बे, मुबंई
उमरेड औष्णिक विद्युत केंद्रनागपुर जिल्हा
बल्लारपुर औष्णिक विद्युत केंद्रचंद्रपुर जिल्हा

Maharashtratil parjanyaman

 

महाराष्ट्र्राला पाऊस अरबी समुद्रावरून येणार्‍या नैऋत्य मोसमी वार्‍यापासून मिळतो. जून ते सप्टेंबर या कालखंडात प्रामुख्याने हा पाऊस पडतो. कोकण भागात व घाट प्रदेशावर हा पाऊस मोठया प्रमाणावर पडतो. किनार्‍यापासून पूर्वेकडे अंतर्गत भागात जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. सह्याद्री रांगेला लागून पूर्वेकडे असलेला प्रदेश 'पर्जन्यछायेचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो. मध्य महाराष्ट्र्रापासून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरावरून किनारा ओलांडून अंतर्गत भागात येणारा आवर्त पाउस पडतो. या पावसाचे प्रमाण पूर्वेकडे वाढत जाते. राज्यातील पावसाचे प्रमाण सोबतच्या नकाशात दाखवले आहे.
कोकणात दरवर्षी २५०० ते ३५०० मि.मी. पाऊस पडतो. मात्र महाबळेश्वरच्या पूर्वेला केवळ १५ कि.मी. अंतरावर असणार्‍या पाचगणी या ठिकाणी १८६५ मि.मी. इतका कमी पाऊस पडतो. याच्याही पूर्वेला फलटण या ठिकाणी ५०० मि.मी. हूनही कमी पाऊस पडतो. म्हणूनच या भागाला पर्जन्यछायेचा प्रदेश असे म्हणतात. याउलट घाटाच्या पायथ्याशी कोकणातील बाजूस पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण वाढलेले आढळते. घाटमाथ्यावरील आंबोली या दक्षिण कोकणातील ठिकाणी ७२०० मि.मी. पाऊस पडतो. जुलै व ऑगस्ट हे जास्तीत जास्त पावसाचे महिने आहेत. एका दिवसातील जास्तीत जास्त पर्जन्यमान ५५० मि.मी. इतके झाल्याची नोंद १० सप्टेंबर १९३० ला मुंबईत झाली आहे.

Maharashtrache lok ani samaj jivan

  

महाराष्ट्र्राचे वेगळेपण आहे ते मुख्यत: त्याच्या मराठी भाषेमुळे अखिल महाराष्ट्र्र प्रदेशात मराठी हीच लोकव्यवहाराची भाषा आहे. लोकांच्या बोलीभाषा विभागपरत्वे काहीशा भिन्न असल्या उदा. वर्‍हाडी, अहिराणी इ. तरी त्या मराठीच्याच उपभाषा म्हणून आहेत. मराठी ग्रांथीक व पांढरपेशा मराठी समाजाची भाषा हा एक मराठी भाषेचा दुसरा स्तर आहे. या ग्रामीण स्तरात अवांतर प्रादेशिक अनेक फरक आहेत. महाराष्ट्र्रीय समाज म्हणजे मराठी भाषा बोलणारे ज्या सलग प्रदेशात बहुसख्य आणि शतकानुशतके आहेत तो समाज. महाराष्ट्र्र प्रदेशात स्थायिक झालेले सर्व लोक, मग ते कोणत्याही भाषेचे, धर्माचे, वंशाचे व प्रांताचे असले, तरी ते 'महाराष्ट्र्रीय समाजा' चेच घटक होत.
भारतीय समाज, संस्कृती व लोकजीवनाच्या प्रमुख धारेतच महाराष्ट्र्र समाज, संस्कृती व लोकजीवनाची धारा समाविष्ट झाली आहे. तथापी तीत काही वेगळेपण वा वैशिष्टयेही आहेत.

महाराष्ट्रातील आदिवासी जमाती



 
प्रदेश/जिल्हा प्रमुख आदिवासी जमाती
सह्याद्री पर्वतीय प्रदेश
ठाणे
रायगड
नाशिक
अहमदनगर
सातपुडा पर्वत
नंदुरबार/धुळे
अमरावती
गोंडवन प्रदेश, मराठवाडा व विदर्भ, नागपूर
चंद्रपूर व गडचिरोली
महादेव कोळी, वारली, गोंड, पारधी
ठाकर, वारली, कातकरी
महादेव कोळी, कातकरी
गोमित, पारधी, भिल्ल, कोरकू, गोंडा, ढणका
गोंड
माडिया-गोंड, कोया, हळबा