आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Saturday 1 September 2012

A LITTLE THINK

                                                              थोडासा विचार करूया    
              
  
              मुलांना त्यांचे म्हणणे व अनुभव वर्गामध्ये व्यक्त करायला मिळत नाही . वर्गात नेहमी शिक्षकाचाच आवाज ऐकू येत असतो . मुले बोलतात तेव्हा एक तर ते प्रश्नांची उत्तरे देतात किवा शिक्षकांच्या शब्दांचाच पुनरुच्चार करत असतात .मुले स्वतः क्वचितच कृती करतात अथवा स्वताला पुढाकार घेण्याची संधी अभावाने मिळते .अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांना स्वतःचा आवाज गवसण्यासाठी सहाय्य केले पाहिजे .त्यांचे कुतूहल जोपासले पाहिजे .अनेक गोष्टी करून पाहण्याची , प्रश्न विचारण्याची , शोध घेण्याची त्यांची  उत्सुकता वाढवली पाहिजे .पाठ्यपुस्तकातील ज्ञानाची घोकंपट्टी करण्याची क्षमता विकसित करण्या ऐवजी , शाळेत मिळण्याऱ्या ज्ञानाबरोबर त्यांच्या अनुभवांची सांगड घालण्याची क्षमता विकसित केली पाहिजे .

No comments: