आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Friday 2 May 2014

सुविचार संग्रह -2

१.एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

२.सहल म्हणजे मानसिक आनंदाची सामुहिक क्रिडा.

३.परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

४.मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

५.खिडकी म्हणजे आकाश नसतं.

६.आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

७.बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

८.जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

९.मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

१०.भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचे फुल कशासाठी जगायचे हे शिकवते.

११.वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

१२.कविता म्हणजे भावनांचं चित्र!

१३.संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

१४.तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

१५.ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

१६.स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

१७.अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

१८.तुलना करावी पण अवहेलना करू नये.

१९.समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.

२०.आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

२१.मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही.

२२.चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.

२३.व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्विकारा

२४.आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

२५.तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

२६.अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

२७.विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

२८.मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

२९.आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

३०.आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

३१.प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.

३२.तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

३३.सगळेच निर्णय मनाने घेऊ नका, काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

३४.काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोच.

३५.लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

३६.चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

३७.तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

३८.भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

३९.चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

४०.आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

४१.उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही.

४२.पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

४३.अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात.

४४.मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

४५.संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

४६.रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

४७.अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

४८.अंथरूण बघून पाय पसरा.

४९.कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत. ते मिळवावे लागतात.

५०.तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

No comments: