आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 29 July 2013

मनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा !

१. ध्यान

कोणत्याही बाहेरच्या किंवा शरीरातील भागावर किंवा क्रियेवर मन एकाग्र करणे यास ध्यान असे म्हणतात. यात शरिरात होणार्‍या निरनिराळ्या संवेदनांकडे तसेच मनात येणार्‍या विचारांकडे साक्षीभावाने पहावे. ध्यानाच्या पुढील अवस्थेत व्यक्ती स्वतःलाही विसरून विचारशून्य अवस्थेत जाऊन आत्मानंद अनुभवते. बुद्धी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी गायत्रीमंत्र, त्रिबंध प्राणायाम आणि ध्यान हे निश्चितपणे उपयोगी पडतात.


२. नामजप आणि प्रार्थना

सर्वांनाच सर्व वेळी ध्यान लावणे शक्य होईल किंवा जमेल असे नाही. त्यामुळे एकाग्रता वाढवण्यासाठी नामजप आणि प्रार्थना यांचे साहाय्य होते.

२. अ नामजप कोणता करावा ?

आपली कुलदेवी अथवा कुलदेव यांचा नामजप प्रतिदिन कमीतकमी २० मिनिटे करावा. तसेच पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन ३० मिनिटे करावा.

२. आ प्रार्थना कोणत्या कराव्यात ?

१. ‘हे कुलदेवते, तुझी कृपादृष्टी सदैव माझ्यावर राहू दे.’

२. ‘हे बुद्धीदाता श्री गणेशा, माझा अभ्यास चांगला होण्यासाठी मला शक्ती आणि सद्बुद्धी दे.’

No comments: