आपणा सर्वांचे स्वागत आहे

आपणा सर्वांचे स्वागत आहे

Monday 29 July 2013

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाचे योग्य वेळापत्रक करा !

१. वेळापत्रक का करायचे ?

महत्त्व आणि लाभ

* प्रत्येक कृती नियोजन करून केल्यामुळे ध्येय साध्य करणे सोपे होते.

* ध्येय साध्य करण्याच्या प्रयत्नांत शिस्त आल्याने प्रयत्नांची सुलभता वाढते.

* विविध विषयांच्या अभ्यासाची समयमर्यादा ठरवल्याने मनावरचा ताण हलका होतो आणि एका विषयाचा अभ्यास करतांना दुसर्‍या विषयाचे विचार मनात येत नाहीत.

* नियोजन केल्याने विचारांचा गोंधळ होत नाही.

* विचारांत सुस्पष्टता आल्याने मन शांत राहून वेळ आणि मनाची ऊर्जा वाया जात नाही.

* आत्मविश्वास वाढतो.

* ध्येयनिश्चितीची खात्री पटते !

२. वेळापत्रक करतांना पुढील गोष्टी ध्यानात घ्या !

* सर्व विषयांना योग्य पद्धतीने प्राधान्य द्या.
उदा. प्रत्येक विषयाच्या सिद्धतेला स्वतःला लागणारा वेळ लक्षात घेऊन हा प्राधान्यक्रम बदलेल.

* परीक्षेच्या ऐन वेळेपर्यंत अभ्यासाचे नियोजन न करता काही काळ विषयांच्या सरावाकरता ठेवा.

* नियोजन करतांना सलग खूप वेळ अभ्यास न करता मध्ये मध्ये वैयक्तिक आवरणे, जेवण-न्याहारी, विश्रांती, व्यायाम, दैनिक वाचन, नामजप इ. गोष्टी करण्याचे नियोजन करा.

* सर्वसाधारणपणे २० वर्षांचा सामान्य क्षमतेचा विद्यार्थी सलग दोन तास एकाग्रतेने अभ्यास करू शकतो. त्यानंतर एक तास इतर गोष्टींसाठी ठेवू शकतो. अशा पद्धतीने दिवसातून १० तास अभ्यास सहज होतो.

* सर्व दैनंदिन गोष्टींसाठी योग्य तो वेळ देऊन नियोजन करा !

* समयमर्यादा ठरवतांना प्रत्येक गोष्टीसाठी पुरेसा वेळ द्या !

* नियोजनातील प्राधान्य बदलावे लागले, तर त्याची सिद्धता ठेवा !

* इतरांनी केलेल्या नियोजनांचा अभ्यास करा !

* इतरांच्या नियोजनाची तुलना न करता त्यातील आपल्याला शक्य असणार्‍या गोष्टी स्वीकारा !

* केलेले नियोजन पालकांना दाखवून घ्या आणि त्यांच्या सूचनांचा विचार करा !

* नियोजन हे केवळ आपल्या सोयीसाठी आहे, हे ध्यानात घ्या !

* काही वेळा ऐनवेळी नियोजन बदलून वेळेची जुळवाजुळव करावी लागल्यास ते स्वीकारा !

संदर्भ: सनातन-निर्मित-ग्रंथ, ' अभ्यास कसा करावा? '

No comments: